Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला असून आतापर्यंत यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यातील १८ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असल्याने बळीराजावर संकट ओढावलं आहे.
अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्यांना फटका
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धाराशिव, बीड, जालना जिल्ह्यांना बसला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ गावांचा संपर्क तुटला. धाराशिव जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या २०० जणांची एनडीआरएफ आणि लष्कराने सुटका केली. चिंचोगील (ता. भूम) येथे ७० वर्षीय महिलेचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. वीज पडून नांदेड जिल्ह्यात एका, तर लातूर जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. एक जण वाहून गेला. मराठवाड्यात १८ लाखांवर हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत.
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज; कोकण, विदर्भ, मराठवाड्यात जोर वाढणार
शेतकरी वाहून गेला
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा मंडलात आठ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली. वरखेडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने स तीश मोहन चौधरी (३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातील घाटपिंपरी, वागेगव्हाण, वडनेर आदी ठिकाणी सुमारे १५० जण पुरात अडकले होते. त्यांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली. रूई येथील १३ जणांना नौकेद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, तर देवगाव येथील २८ जणांना हेलिकॉप्टरने सुखरूप सुरक्षितस्थळी आणण्यात आले. एनडीआरएफ, लष्कराचे पथक बचाव कार्य करत आहे. जिल्ह्यात आज, मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
Nagpur Rain : अतिवृष्टीने शेकडो घरांचे नुकसान, 8 हजारहून घरं अंशत:, तर 132 घरं पूर्ण उद्ध्वस्त; नागपुरातील हृदयद्रावक चित्र
लातूर जिल्ह्यात दोन बळी
लातूर जिल्ह्यात सांगवी (ता. निलंगा) येथील अनिता मारुती राठोड (वय ३८) यांचा वीज पडून मृत्यू झाला. बावलगाव येथील एक जण जखमी झाले. काटेजवळगा (ता. निलंगा) येथे दयानंद संभाजी बोयणे (वय ४२) पाण्यात वाहून गेले. जिल्ह्यातील २० रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
बीडमधील देविनिमगावमधील घरांत पाणी शिरलं, अनेक कुटुंबाचं नुकसान
दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठड्यातील अहवालानुसार मराठवाड्यात १२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

