कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अतिवृष्टी, पंचनामे आणि नुकसान भरपाईवर भाष्य केलं.ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचा खूप मोठे नुकसान झालं आहे. या महिन्यात सर्वात जास्त बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झाला झालेल्या शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील. पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनी दिले आहेत.सर्वांना निश्चित प्रकारे मदत मिळणार आहे. सर्व पंचनामे लवकरात लवकर करू. दीपावलीआधी शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारकडून घेतली जाईल.