Chatrapati Sambhajinagar News : शिवाजीनगर भुयारी मार्गामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भुयारी मार्गातील गाळात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाने या मृत्यूसाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं असून गंभीर आरोप केले आहेत.
अंकुश भगवानराव शंकपाळ, वय ६१, राहणार चिकलठाणा, असं अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बीड बायपास परिसरातील नागरिकांना आणि शिवाजीनगर येथील नागरिकांना ये – जा करण्यासाठी सोयीचं व्हावं, यासाठी शिवाजीनगर भुयारी मार्ग बनवण्यात आला. मात्र हा भुयारी महामार्ग बनवताना अनेक अडचणी आल्या.
दारू पिताना तिघांचा वाद, भांडण विकोपाला गेलं आणि अनर्थ घडला; दोघांनी तिसऱ्याला संपवलं; छत्रपती संभाजीनगरात खळबळ
शासकीय यंत्रणांनी निष्काळाजीपणे केलेल्या कामामुळे हा महामार्ग कायम चर्चेत राहिला आहे. नुकतंच या भुयारी मार्गामध्ये पावसाचं पाणी साचत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला होता. त्यानंतर या भुयारी मार्गावर पत्राची शेड टाकून पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी थांबलंच नाही. याच दरम्यान भुयारी मार्गात गाळ असल्याने अनेक वाहनं घसरून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यामुळे भुयारी मार्गाच्या कामावरून प्रशासनावर सडकून टीका होत आहे.
Solapur News : आधी सुनेने रेल्वेखाली आयुष्य संपवलं, नंतर मुलाचंही टोकाचं पाऊल; आठ महिन्यांनी आईचं भयंकर कृत्य, कुटुंबावर शोककळा
दरम्यान अंकुश शंकपाळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास स्वतःच्या स्कुटीने बीड बायपासकडे जात होते. भुयारी मार्गात साचलेल्या चिकट मातीमुळे शंकरपाळे यांची दुचाकी घसरून ते खाली पडले. यात डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अंकुश शंकपाळ यांच्यावर खाजगी रुग्णालात उपचार सुरू असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
ओबीसींवर अन्याय, भाषणावेळी घोषणाबाजी; मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलकांना फटकारलं
अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करा –
शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मृत अंकुश यांचा मुलगा शरद शंकपाळ यांनी केली आहे.

