Navratri 2025: देवीच्या मंडपातील सुरक्षेबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांना धडे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलिसांची कायम गस्त राहणार आहे. नऊ दिवसांच्या कालावधीत पोलिसांचा मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
BKC ते कफ परेड मेट्रो सुसाट! दीड तासांचा प्रवास अर्ध्या तासावर, थांबे कोणते? तिकीट दर फक्त…
दहशतवाद्यांच्या कायम नजरेत असलेल्या मुंबईला सणांच्या कालावधीमध्ये धोका, धमक्यांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यान कोणताही घातपात अगर अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांच्या हद्दीतील मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या बैठका घेऊन उत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देवीच्या मंडपामध्ये दागिन्यांची चोरी तसेच इतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीबरोबरच कार्यकर्त्यांची कायम नेमणूक असावी, अशा सूचना सर्व मंडळांना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळीही देवीच्या मंडपात कार्यकर्ते किंवा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असेही पोलिसांनी आपल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांचा रविवारी खोळंबा! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक, Timetable बघूनच घराबाहेर पडा
उत्सव कालावधीत उपद्रवी घटकांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जाईल, अशी कृत्ये केली जाऊ नयेत यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांची माहिती काढून त्यांना समज देण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन, रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. गरबा, दांडिया तसेच नवरात्रोत्सव आयोजनाच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
महालक्ष्मी, मुंबादेवी येथे विशेष बंदोबस्त
मुंबईच्या महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक या ठिकाणी गर्दी करतात. दोन्ही मंदिर परिसरात जत्रेसारखे चित्र असते. त्यामुळे या दोन्ही मंदिर परिसरात विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ मागणीवरून सचिन खरात संतापले, नेमकं काय म्हणाले?
समाजमाध्यमांवरही नजर
नवरात्रोत्सव कालावधीत समाजमाध्यमांवरही बरीच खळबळ सुरू असते. यातून धार्मिक भावना दुखावतील, समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट कुणी करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर पोलिसांची उत्सव कालावधीत समाजमाध्यमांवर नजर राहणार आहे
गरबा, दांडियांसाठी मार्गदर्शक सूचना
- स्वयंसेवकांची नेमणूक करून येणाऱ्यांची कसून चौकशी आणि नोंद ठेवावी
- गरब्याच्या ठिकाणी अनावश्यक साहित्य आणण्यास बंदी करावी
- आयोजनाच्या नजीक वाहने पार्किंग करण्यास देऊ नये
- समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारावेत
- आयोजकांना सीसीटीव्ही लावण्याची सक्ती करण्यात आली आहे
- विशेष सावधगिरी म्हणून खासगी सुरक्षारक्षक नेमावेत
- परवानगी दिलेल्या वेळेतच आयोजन करण्यात यावे
- ध्वनिप्रदूषण करून न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करू नये

