Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्पाचं काम पार पडलं. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई – अहमदाबाद अंतर २ तासांवर येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते.
न्यू ऑस्ट्रियन टनेल पद्धत वापरुन खोदलेला हा बोगदा बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान २१ किमीचा मार्ग भूमिगत आहे. या मार्गातील ७ किमीचा भाग हा ठाणे खाडीखालील आहे. ४.८८ किमीचा टप्पा मुंबई – अहमदाबाद टनेल मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. एकूण ५०८ किमी लांब असलेली ही योजना भारत आणि जपानमधील एक महत्त्वपूर्ण करार आहे.
ठाणे-बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार, दीड तासांचा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर येणार; कसा असेल मार्ग?
शुक्रवारी जपानमधील एक टीम या बुलेट ट्रेनची पाहाणी करण्यासाठी आली होती. ३२० किमीचा व्हायडक अर्थात पूलाचा भाग तयार झाला आहे. १७ नद्यांवर उभारण्यात येणाऱ्या पुलांचं काम वेगात सुरू आहे. सर्व स्टेशनचंही काम सुरू आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबई – अहमदाबाद या दोघांमधील अंतर २ तास ७ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ठाणे, वापी, सुरत, बडोदा, आणंद अशी स्टेशन्स या मार्गावर असतील.
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचं पहिलं सेक्शन सूरत ते बलिमोरा असेल, हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर २०२८ पर्यंत या प्रकल्पाचं काम ठाण्यापर्यंत पोहोचेल, त्यानंतर २०२९ मध्ये बीकेसीपर्यंत काम पूर्ण होईल. बुलेट ट्रेन सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात असेल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे.
ठाकरेंनी बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं, फडणवीसांनी मविआ सरकारवर खापर फोडलं
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनदरम्यान असलेल्या स्टेशन्समुळे सर्व शहरांना याचा आर्थिक फायदा होईल आणि याचा एकत्रित परिणाम पाहायला मिळेल. ट्रेनच्या सुविधा अशाप्रकारे डिझाइन करण्यात आल्या आहेत, की वर्दळीच्या वेळी सुरुवातीला प्रत्येक अर्धा तासाला ट्रेन असेल, नंतर नेटवर्क स्थिरस्थावर झाल्यानंतर दर १० मिनिटांला ट्रेन असेल. त्यामुळे तिकीट रिझर्वेशन करण्याची गरज भासणार नाही, या प्रोजेक्टच्या संपूर्ण टीममुळे, टेक्नोलॉजीमुळे आत्मनिर्भर भारतचं मोठं उदाहरण समोर आहे. या प्रोजेक्टमधील अनेक टेक्नोलॉजी भारतात तयार करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातील अनेक गोष्टी भारताबाहेर विक्रीसाठी जाऊ लागल्या आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

