Maharashtra Weather Update: 25 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता IMDने वर्तवली आहे. कोणत्या भागात अलर्ट जारी? वाचा वेदर रिपोर्ट…
महामुंबईमध्ये शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक होती. उर्वरित ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मुंबईत सांताक्रूझ येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत ५९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे केवळ १.२ मिलीमीटर पाऊस पडला. कुर्ला येथे २२.३, अंधेरी येथे ३२.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मालाड ते दहिसर परिसरात जेमतेम पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामुंबईमध्ये डोंबिवली येथे पावसाच्या सरींची तीव्रता अधिक होती. डोंबिवली पूर्वेकडील केंद्रावर ६१ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. या आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसांत महामुंबई परिसरात फारशा पावसाची शक्यता नाही.
जयंत पाटलांबद्दल नको नको ते बोलले, गोपीचंद पडळकरांना CM फडणवीसांनी फटकारलं
मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र शनिवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारीही महामुंबई परिसरात हलक्या ते मध्यम सरींचाच अंदाज आहे. मंगळवारी पावसाची तीव्रता फारशी वाढली नाही, तरी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले.
ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील गाव आणि शहरांचा पुन्हा संपर्क तुटण्याची भीती, एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा इशारा
ढगाळ वातावरणामुळे उकाडा
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सरासरीहून अधिक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी अनुपम काश्यपी यांनी वर्तवला. दुर्गापूजेदरम्यान मुंबई, पुणे, तसेच राज्यात मेघगर्जना, विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचाही अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात गुरुवारपर्यंत कमाल तापमान ३० अंश किंवा आसपास राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण आणि ३० अंशांच्या पुढील तापमान यामुळे अस्वस्थताही जाणवू शकते.

