Thane Ghodbunder Road : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ही बंदी असणार आहे.
याआधीही अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे निर्देश वाहतूक विभागाकडून देण्यात आले होते. मात्र हे आदेश कागदावरच राहत असल्याने पुन्हा एकदा कोंडीचे संकट उभे ठाकते. त्यामुळे या प्रवेशबंदीचे वाहतूक शाखेसमोर मोठे आव्हान आहे.
घोडबंदर रस्त्यावर सेवा रस्त्यांच्या एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. यासोबत मेट्रो मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीने या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झालेली असल्याने वाहतूककोंडीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजल्यानंतरच जड वाहने सोडण्याचे आदेश शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले.
ठाणे-बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार, दीड तासांचा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर येणार; कसा असेल मार्ग?
दरम्यान रात्री बारापूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले. त्यानुसार तातडीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
घोडबंदरवासीयांचा संताप, शिंदेंचा मोठा निर्णय, ‘या’ वाहनांना ठाण्यात NO ENTRY
जेएनपीटीकडून घोडबंदर रोडला येणारी वाहने रात्री बारानंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या आहेत. मात्र ही अवजड वाहने ठाणे शहराच्या वेशीवर रोखताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. याआधीही अशा प्रकारे अवजड वाहनांवर दिवसा ठाणे शहरात येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर ही वाहतूक पुन्हा शहरात प्रवेश करत असल्याने सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
Metro – 3 Aqua Line : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो-३ चा अखेरचा टप्पा दसऱ्याला सुरू होणार? संपूर्ण मार्गावर २७ स्टेशन, पाहा मार्ग
पावसाची उघडीप, वाहतूक सुरळीत
बुधवारी सकाळपासूनच पावसाने उघडीप दिल्याने घोडबंदर रोडवर वाहतूक सुरळीत असल्याचे चित्र दिसून आले. सकाळच्या सत्रात काही प्रमाणात असलेली कोंडी कमी झाली. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दोन्ही मार्गिकांनी मोकळा श्वास घेतल्याचे समोर आले. दरम्यान, सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी भिवंडीच्या गोदाम पट्ट्यातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. बुधवारी हेच प्रमाण इतर दिवसांच्या तुलनेत कमी असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

