• Sat. Mar 7th, 2026

    आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही, अजितदादांचा चिमटा; आता भाजपकडून जशास तसं उत्तर , महाजन म्हणाले…

    आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही, अजितदादांचा चिमटा; आता भाजपकडून जशास तसं उत्तर , महाजन म्हणाले…

    Girish Mahajan On Ajit Pawar: राष्ट्रवादीच नेते अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसंच महाजन यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले.

    आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही, अजितदादांचा चिमटा; आता भाजपकडून जशास तसं उत्तर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: आमच्या पक्षात दिल्लीला जाऊन उमेदवार ठरवावा लागत नाही, असा टोला भाजपला लगावणाऱ्या उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना जलसंपदा मंत्री Girish Mahajan यांनी जशास तसे उत्तर दिले. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. त्यांच्या पक्षाचे तेच सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांना असे बोलण्याचा अधिकार आहे. आमचा पक्ष देशभर पसरला असल्याचा पलटवार महाजन यांनी केला.

    सेवा पंधरवड्याच्या शुभारंभासाठी गिरीश महाजन हे बुधवारी नाशिक शहरात आले होते. कालिदास कला मंदिरातील कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. Meenatai Thackeray यांच्या पुतळ्याची विटंबनेची घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी कुण्या माथेफिरूने किंवा कुणी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असावे. अशा विकृतीचा शोध घेतला जाईल. परंतु अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन महाजन यांनी केले.

    Maharashtra TimesVasant More : भाजप म्हणालं पुण्यात 100 जागा फिक्स, वसंत मोरेंचा तिरका बाण; म्हणाले, कृपा करुन उरलेल्या…

    ‘गांधी कुटुंबातील इंदिरा गांधी ब्रॅण्ड होत्या. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा काही औरच होती. मोजक्याच व्यक्तींचे कर्तृत्व अफाट असते. परंतु सोनिया गांधी, राहुल गांधी हे ब्रॅण्ड हल्ली चालत नाहीत. ठाकरेंचा ब्रॅण्डही नामशेष झाला आहे, असा दावा करत गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर निशाणा साधला आहे.

    मनोज जरांगेंच्या इशाऱ्यावर काय म्हणाले महाजन?

    Maratha Reservation आंदोलक Manoj Jarange Patil यांच्या भूमिकेवरही गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. मनोज जरांगे यांना जे हवे होते ते सरकारने त्यांना कायदेशीरपणे दिले आहे. मागण्या मान्य झाल्याने जरांगे यांनी आनंदोत्सव साजरा करीत गुलालही अंगावर घेतला आहे. त्यामुळे पुन्हा दसऱ्या मेळाव्यात आरक्षणाबाबतची भूमिका मांडू असे म्हणणे योग्य नाही. हा विषय उच्च न्यायालयात गेला आहे. न्यायालयाच्या निकालाकडे सरकारसह सर्वांचेच लक्ष आहे. परंतु जरांगे न्यायालयासह सर्वांनाच आव्हान देणार असतील तर हे चालणार नाही, असं महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा