Kolhapur Ambabai Mandir Closed Today : कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आज दर्शनासाठी बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृह स्वच्छता करण्यात येणार असल्याने भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे मंदिरातील नियमित स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून गर्भगृहातील मूर्तीचे थेट दर्शन यावेळी भक्तांना शक्य नाही. या काळात मंदिरातील सरस्वती मंदिर चौकातून भाविकांना देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन करता येईल अशी विशेष सोय करण्यात आली आहे. याठिकाणी मूर्तीचे दर्शन घेता येईल, असेही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
Kolhapur News : भाविकांसाठी मोठी बातमी! कोल्हापुरातील बाळूमामा मंदिर 4 दिवस बंद, कारण काय?
मंदिरातील गर्भगृह बंद असतानाही मंदिराच्या इतर भागात धार्मिक कार्यक्रम सुरळीतपणे पार पडतील. तर सायंकाळी 6.30 नंतर गर्भगृह पुन्हा दर्शनासाठी उघडण्यात येईल आणि भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येईल. दरम्यान या गर्भगृह स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने देवस्थान समितीकडून भाविकांनी सहकार्य करण्याबाबत आणि नियमांचे पालन करण्याबाबत पुन्हा एकदा विनंती करण्यात आली आहे.
महादेवी हत्तीण अखेर कोल्हापूरला परतणार? सुप्रीम कोर्टात पार पडली महत्त्वाची सुनावणी, काय ठरलं?
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नवरात्रीची लगबग
शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता आणि सजावटीसाठी मोठ्या लगबगीने काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या देखरेखीखाली मंदिरातील शिखरांची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई, मंदिर परिसरातील स्वच्छता यासह संपूर्ण परिसर सुस्थितीत करण्याचे काम कर्मचारी आणि स्वयंसेवक एकत्रितपणे करत आहेत.
रणांगणात वीर लढले, तसेच क्रिकेटपटू खेळले; पाकिस्तानला चीतपट केलं, कोल्हापुरात विजयोत्सव
सुरू असलेल्या या स्वच्छता मोहिमेत देवीच्या पालखी मार्गांची सफाई तसेच मंदिर परिसरातील दीपमाळा, गरुड मंडप परिसर देखील सजवला जात आहे. दर्शन मार्गाचेही व्यवस्थापन देवस्थान समितीकडून योग्यरीत्या करण्यात आले आहे. याशिवाय, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, गर्दीचा ताण लक्षात घेता येथील पार्किंगची व्यवस्था सुधारण्यात आली असून, नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आरामदायी व सुरळीत अनुभव देता येईल, असा प्रयत्न केला जात आहे.

