Devendra Fadnavis On Thackeray Brothers: माझे विधान नोंदवून ठेवा, मुंबईत महायुतीतचेच महापौर येणार, हा निर्धार व्यक्त करीत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांनी रणशिंग फुंकले.
मुंबई भाजपतर्फे वरळी डोम येथे मंगळवारी विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवनियुक्त मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
बाइक टॅक्सीचे एक पाऊल पुढे; दीड किमीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये, परिवहन प्राधिकरणाची मंजुरी
‘आमच्या पक्षात अमित साटमसारखा सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला. नरेंद्र मोदी नावाचा जगातील सर्वांत मोठा ब्रँड आमच्याकडे आहे’, असे गौरवाद्गारही त्यांनी काढले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईच्या गिरणगावात राहणारा मराठी माणूस आज वसई विरार, कर्जतला फेकला गेला आहे. आम्ही मात्र बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला. म्हाडाच्या माध्यमातून मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांच्या हाती मुंबईची सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि लोकांचे स्वप्नही पूर्ण करता येत नव्हते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला.
‘आमच्याकडून ओरबाडलं, आम्ही गनिमी कावा दाखवला’, फडणवीसांनी दोन्ही ठाकरेंना डिवचलं?
आम्ही धारावीच्या दहा लाख लोकांना घर देत आहोत. या सर्व लोकांना धारावीतच घर देण्यात येणार आहे. प्रत्येकाला घर देणारा आमचा हा प्रकल्प आहे, असे सांगत त्यांनी आमचे सरकार मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील सगळ्यात मोठ्या बीडीडी चाळीचा बिल्डरच्या दबावाखाली तुम्ही विकास होऊ दिला नाही. आज या देवाभाऊने या चाळी विकसित करून दाखवले, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं 100 रुपयांचं चॅलेंज, राऊतांवरही घणाघात, म्हणाले, ‘काही उचके रोज सकाळी उठून…’
महापौरपदासाठी नार्वेकर, शिंदेंचा फोन आला होता
मागील महापालिका निवडणुकीनंतर भाजपचा महापौर सहज करता आला असता. आमच्या अवघ्या दोन जागा कमी होत्या. आम्ही सारी जुळवाजुळवही केली होती. मात्र, मैत्रीच्या नात्यासाठी हे पद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे नर्व्हस आणि नाराज असून महापौरपद मिळावे म्हणून मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी तेव्हा फोन केला होता, असा गौप्यस्फोटही फडणवीसांनी केला. त्यानंतरचा अनुभव म्हणजे अच्छा सिला दिया तुने… असा होता, असेही ते म्हणाले.

