राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे आज पोलिसांना शरण आले आहे. त्यांना आता उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे पोलिसांना शरण आले आहेत. या प्रकरणात उद्धव निमसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. गेल्या महिन्यात पोळ्याच्या दिवशी धोत्रे आणि निमसे अशा दोन गटात हाणामारी झाली होती. यामध्ये राहुल धोत्रे हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण सात ते आठ दिवसांत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उद्धव निमसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उद्धव निमसे यांना सुरुवातीला जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पण खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जामीनचा अर्ज फेटाळला होता. यानंतर उद्धव निमसे गेल्या 20 दिवसांपासून फरार होते. यानंतर ते आज अचानक पोलिसांना शरण आले आहेत. उद्धव निमसे यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. त्यावेळी पोलीस त्यांची बाजू न्यायालयात मांडतील.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित प्रकरण गेल्या महिन्यातील 22 ऑगस्टची आहे. या दिवशी बैलपोळा होता. नाशिकच्या जनार्दननगर दिंडमेळ्याच्या परिसरात गाडीचा कट लागल्यावरुन दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्यात हाणामारी झाली आणि नंतर त्याचं रुपांतर थेट टोळीयुद्धात झालं. धोत्रे आणि निमसे टोळी यांच्यात मोठा संघर्ष झाला. या टोळीयुद्धात राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान राहुल धोत्रे या तरुणाचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलिसांनी संशयितांविरुद्ध खूनाचा गुन्हादेखील दाखल केला होता. या प्रकरणात संशयित उद्धव निमसे यांना न्यायालयाने जामीन फेटाळला होता. पोलीस त्यांचा शोध घेत होते. तर दुसरीकडे घटना घडून 20 दिवस उलटले तरी पोलिसांनी निमसे यांना अटक केली नाही म्हणून नागरिकांना मोर्चा काढून अटकेची मागणी केली होती. मनसे आणि ठाकरे गटाच्या नाशिकमध्ये निघालेल्या मोर्चातही याबाबत मागणी करण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यांनी आपण या गुन्ह्यात सहभागी असल्याचं चौकशीत कबूल केलं होतं. त्यानंतर पोलीस निमसे यांचा शोध घेत होते. अखेर उद्धव निमसे हे आज स्वत:हून पोलिसांना शरण आले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा