• Mon. Mar 9th, 2026

    Aishanya Dwivedi : ‘भारत वि. पाक सामना पाहू नका’; पहलगाम हल्ल्यात आपलं कुंकू गमावणाऱ्या ऐशान्याची सर्व भारतीयांना विनंती

    Aishanya Dwivedi : ‘भारत वि. पाक सामना पाहू नका’; पहलगाम हल्ल्यात आपलं कुंकू गमावणाऱ्या ऐशान्याची सर्व भारतीयांना विनंती

    Aishanya Dwivedi : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबीयांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ क्रिकेट सामन्याला विरोध दर्शवला आहे. शहीद शुभमची पत्नी ऐशान्या द्विवेदी आणि वडील संजय द्विवेदी यांनी सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले शुभम द्विवेदी यांचे कुटुंबीय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ क्रिकेट सामन्याला विरोध करत आहेत. शुभमची पत्नी ऐशान्या द्विवेदी, त्याचे वडील संजय द्विवेदी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब बीसीसीआयच्या या निर्णयामुळे नाराज आहेत. त्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या, “मला हे समजत नाहीये. मी लोकांना यावर बहिष्कार टाकण्याची विनंती करते. सामना पाहू नका आणि तुमचा टीव्हीसुद्धा चालू करू नका.”

    ऐशान्या यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना स्वीकारायला नको होता. बीसीसीआयच्या भावना त्या २६ कुटुंबांसाठी नाहीत. या सर्वांच्या बलिदानाला तुमच्यासाठी काहीच किंमत नाही.

    भारतीय क्रिकेट संघावर प्रश्नचिन्ह उभे करत त्या म्हणाल्या की, काही क्रिकेटपटूंना वगळता, कोणताही खेळाडू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी पुढे आला नाही. ऐशान्या म्हणाल्या, “आमचे क्रिकेटपटू काय करत आहेत? असे म्हटले जाते की क्रिकेटपटू राष्ट्रवादी असतात. याला आपला राष्ट्रीय खेळ मानला जातो. एक-दोन क्रिकेटपटूंना वगळता, कोणीही पुढे येऊन असे म्हटले नाही की आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. बीसीसीआय त्यांना बंदूक दाखवून खेळायला भाग पाडू शकत नाही. त्यांनी आपल्या देशासाठी भूमिका घ्यायला हवी. पण ते असे करत नाहीत.”
    Maharashtra TimesSachin Tendulkar थोडक्यात बचावले; विमानाचं करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग अन्….काय घडलं?
    सामन्यातून मिळणाऱ्या कमाईचा वापर पाकिस्तान करणार याबद्दल चिंता व्यक्त करत ऐशान्या म्हणाल्या, “मी स्पॉन्सर आणि ब्रॉडकास्टरला विचारू इच्छिते की, त्या २६ कुटुंबांचं राष्ट्रीयत्त्व संपलं आहे का? सामन्यातून मिळणाऱ्या कमाईचा उपयोग कशासाठी केला जाईल? पाकिस्तान त्याचा उपयोग फक्त दहशतवादासाठी करेल. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना कमाई द्याल आणि त्यांना आपल्यावर पुन्हा हल्ला करण्यासाठी तयार कराल.”
    Maharashtra TimesMathhew Hayden: जो रुटने शतक ठोकलं नाही तर नग्न फिरेल! धाडसी वक्तव्यानंतर हेडनच्या मुलीने केली ‘ही’ मागणी
    शुभम द्विवेदी यांचे वडील संजय द्विवेदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानने आपल्या देशातील 26 निष्पाप लोकांना मारले. भारत सरकारने म्हटले होते की ते पाकिस्तानसोबत कोणताही संबंध ठेवणार नाहीत आणि रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. ज्या दिवसापासून मला (भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल) कळले, तेव्हापासून फक्त मीच नाही तर संपूर्ण देश याचा विरोध करत आहे आणि म्हणत आहे की पाकिस्तानसोबत कोणताही संबंध, राजकीय किंवा खेळाच्या मैदानावर नको. मी याचा विरोध करतो आणि सरकारला जनभावना लक्षात घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती करतो.”

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा