• Sun. Mar 8th, 2026
    Maratha Kunbi Certificate: मराठा तरुणांना कुणबी दाखल्यांचे वाटप सुरु; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

    Maratha Kunbi Certificate: मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे. ⁠महिना अखेरपर्यंत मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे विखे पाटील यांनी सांगितले.

    vikhe patil(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, आंदोलनावेळी पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. मराठा तरुणांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाल्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी सांगितले.

    राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनतंर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीनंतर विखे पाटील यांनी वरील माहिती दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार झालेल्या निर्णयांसदर्भात आणि शासन निर्णयानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
    Maharashtra TimesChhagan Bhujbal: मराठा जीआर रद्द करा किंवा दुरुस्त करा; छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
    दर सोमवारी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी यांची बैठक होईल, त्यानंतर ती माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाला दिली जाईल. तर, मराठा आरक्षण आंदोलनात जे मृत्यू झाले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना नोकरी आणि मदत देण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

    दरम्यान, शासन निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणीची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यानुसार, सरकारने आदेश दिले आहेत. मात्र, अंमलबजावणी करण्यास काही कालावधी लागणार आहे याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विनंती करायची आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

    भुजबळांंना भेटून GRबाबत चर्चा करू…राधाकृष्ण विखे नेमकं काय म्हणाले?

    भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार
    सरकारने मराठा आरक्षणाबाबतचे शासन निर्णय जारी केल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. त्यातच, ओबीसींचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही उघडपणे नाराजी जाहीर केली आहे. याबाबत राधाकृष्ण विखे पाटलांना प्रश्न विचारला असता, मी छगन भुजबळ यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार आहे. त्यामुळे, शासन निर्णय मागे घेण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी देखील समिती गठीत केली असल्याकडे यावेळी विखे पाटील यांनी लक्ष वेधले

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा