Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा अखेर तरामध्ये विराजमान झाला आहे. गेल्या आठ तासांपासून लालबागच्या राजाच्या मूर्तीला तराफ्यात बसवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण त्यात अडचणी येत होत्या. अखेर बाप्पाची मूर्ती तराफ्यावर विराजमान करण्यास यश आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : लालबागच्या राजाची मूर्ती अखेर तराफ्यावर चढवण्याचं मोठं यश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आलं आहे. समुद्राला आता ओहटी आली आहे. भरतीचं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची ट्रॉली जागेवरुन हलली. यानंतर ही ट्रॉली तराफ्याच्या दिशेला नेण्यात आली. पाणी ओसरल्यामुळे मूर्तीला तराफ्यावर चढवण्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून कार्यकर्त्यांकडून तराफ्यावर मूर्ती पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. गेल्या आठ तासांपासून कार्यकर्त्यांकडून अथक प्रयत्न केले जात होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.
गेल्या आठ तासांचा काळ हा लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी आणि मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक करणारा आणि धाकधूक वाढवणारा होता. लालबागचा राजा तराफ्यात विराजमान झाला असला तरी आता तराफा वाळूवर उभा आहे. त्यामुळे तराफा पाण्यात नेण्याबाबत धाकधूक आहे. तरीही बाप्पा अत्यंत निर्विघ्नपणे विसर्जन पार पाडले, अशी भाविकांना खात्री आहे. दरम्यान, आता लालबागच्या राजाचे विसर्जन हे रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी याबाबत माहिती दिली.
असं सगळं पहिल्यांदाच घडतंय
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कधीच इतका वेळ लागलेला नाही. विसर्जनासाठी दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होणं हे असं पहिल्यांदाच घडत आहे. दरवर्षी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास निघते. अतिशय वाजत गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत राजाची शहरभर मिरवणूक निघते. अत्यंत दाटीवाटीच्या गल्ल्यांमधून बाप्पाची मिरवणूक निघते. रस्त्यांवर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमलेली असते. संपूर्ण दिवस, नंतर रात्रभर ही मिरवणूक सुरु राहते. शेवटी दुसऱ्या दिवशी पाहाटे ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचते. तिथे शेवटची आरती केल्यानंतर सूर्योदय उजाळल्यानंतर बाप्पाचं विसर्जन होतं. पण आज सूर्योदयानंतर बाप्पाचं रात्री उशिरा विसर्जन होणार असल्याचं बघायला मिळत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा