Sanjay Raut on Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून ठाकरे सेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी घणाघाती टीका केलीय. राऊत काय म्हणाले जाणून घ्या.
संजय राऊत काय म्हणाले?
आम्ही जे असं म्हणतो की शिंदे आणि पवार यांच्याकडे जी माणस आहेत हे सगळे चोर, डाकू, स्मगलर, खूनी आणि बलात्कार आहेत. त्यांना संरक्षण देणं त्यासाठी यांना सत्ता हवी आहे. आमदार सुनील शेळके यांचं मी प्रकरण बाहेर घडलं, मावळमध्ये खाणकाम चालू आहे, कोट्यवधींचा सरकारला यांनी चुना चावला, अजित पवार त्यांना संरक्षण देत आहेत. असे असंख्य लोकं असून ईडी, सीबीआयवाले गोळा केलेले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. आत एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देता, तेसुद्धा पक्षातील चोरांना संरक्षण देण्यासाठी, अजित पवार कुठे गेली शिस्त, आर्थिक शिस्त ही कोणासाठी आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Ajit Pawar Viral Video : तुम्हारी इतनी हिम्मत… अजित दादांनी ज्यांच्यासाठी महिला IPS Anjana Krishna अधिकाऱ्याला झापलं, त्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा, कारण ठरलं…
बेकायदेशीर मुरूमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं आहे. तुम्ही अर्थमंत्री आहात, हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार राहत नाही. नैतिकतेच्या मुद्द्यावर अनेकांना राजीनामे द्यायला लावले आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री घेणारा माणूस आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्यायला लावत आहेत. तरूण आयपीएस अधिकारी तिला हे सांगतायेत मी सांगतोय ते बेकायदेशीर काम कर आणि हे इतरांना कायदा शिकवतात. हे चालणार नाही ते चालणार नाही बघून घेईल. तु्म्ही चोरांचे सरदार असून महाराष्ट्र राज्य चोरांचं राज्य केलेलं आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनाला भ्रष्टाताराची कीड लावताय त्याल हे जे सुरू आहे ते जबाबदार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र चोरतायेत आणि आता राहिलेला महाराष्ट्र त्यांचे हस्तक चोरत असल्याची खोचक टीका राऊतांनी केली.
अजित पवार यांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा कोण?
दरम्यान, मणिपूर धगधगत असताना पंतप्रधान तिथे जायला ते घाबरत होते, ते अत्यंत डरपोक गृहस्थ आहेत. आपल्याला हिंसेचा चटका बसेल, कोणीतरी काहीतरी फेकेल, या भीतीने त्यांची गाळण उडाल होती. आता त जातायेत कारण त्यांची जाण्याची वेळ आली. जाता-जाता मणिपुरला गेलो नाही याची इतिहासात नोंद राहिल यासाठी ते जात असल्याचं म्हणत संजय राऊतांनी थेट मोदींवर निशाणा साधला.

