• Wed. Mar 11th, 2026
    मुलांना शाळेत पाठवायचं की नाही? ईदची सरकारी सुट्टी सोमवारी, BMC म्हणते शुक्रवारीच, विद्यार्थी-पालक संभ्रमात

    Eid E Milad School Holiday : मुंबई महापालिकेने आधीच आज शुक्रवारी ईद ए मिलादची सुट्टी जाहीर केली असल्याने या दोन्ही निर्णयांत तफावत निर्माण झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत शनिवारी निघणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका लक्षात घेता शुक्रवारी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका टाळण्यासाठी ईद सोमवारी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने मुंबईत सोमवारी, 8 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचे परिपत्रकही काढले. पण मुंबई महापालिकेने ईदची सुट्टी शुक्रवारी, 5 सप्टेंबरला जाहीर केली आहे. मुंबईतील शाळांच्या सुट्ट्यांबाबत महापालिका निर्णय घेते. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी पत्रक काढूनही शाळा नेमक्या कधी भरणार, याबाबत पालक व शाळांमध्येही गुरुवारी गोंधळच होता.

    सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार 8 सप्टेंबरला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्याचा आधार घेत शिक्षण उपसंचालकांनी पत्र प्रसिद्ध केले. मात्र मुंबई महापालिकेने याआधीच आज, शुक्रवारी सुट्टी जाहीर केली असल्याने या दोन्ही निर्णयांत तफावत निर्माण झाली आहे. या दोन परस्परविरोधी आदेशांमुळे गोंधळ निर्माण झाला असून शाळा प्रशासन, पालक आणि विद्यार्थी यांच्यासमोर नेमका कोणाचा आदेश मानायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे.
    Maharashtra TimesKerala Woman VIDEO : बसमध्ये तरुणीच्या छातीकडे रोखून पाहत होता वृद्ध, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, पुढच्या मिनिटाला तिने…
    आदेश वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर शाळांनाही अंतिम निर्णय घेणे कठीण झाले आहे. काही शाळांनी पालकांना आज, शुक्रवारी शाळा सुरू राहण्याची शक्यता वर्तवली तर काही शाळांनी अद्याप मौन बाळगले आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली असून ‘मुलांना उद्या शाळेत पाठवायचे की नाही,’ असे प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत.

    Maratha Aarakshan Andolan : हैदराबाद, सातारा, औंध गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी कसा फायदा होणार ?

    Maharashtra TimesMaharashtra Politics : राजकारणाला कंटाळून एकनाथ शिंदेंना ‘जय महाराष्ट्र’, भाजपने डाव साधला, तिघांचा पक्षप्रवेश
    या संदर्भात प्रतिक्रिया देताना मुंबई मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष अनिल बोरनारे म्हणाले की, ‘मुंबई महापालिका आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या आदेशांत विसंगती आहे. यामुळे शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी एकत्रित व स्पष्ट आदेश तातडीने जाहीर होणे आवश्यक आहे. सुट्टीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांची अधिकच गैरसोय होत आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग आणि महापालिका प्रशासनाने त्वरित संवाद साधून गोंधळ निवळवणे गरजेचे आहे.’

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा