• Tue. Mar 10th, 2026
    लाडकी बहीण योजनेतील ऑगस्टचे पैसे कधी? बाप्पाच्या विसर्जनाआधी मिळणार खुशखबर? नवी अपडेट समोर

    Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता जमा न झाल्याने महिला नाराज आहेत. गणेशोत्सवातही पैसे न मिळाल्याने त्यांची प्रतीक्षा कायम आहे. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे याच महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनमानसात लोकप्रिय झाली. मात्र योजनेतील पडताळणीमुळे महिलांमध्ये नाराजी आहे. यातच आता ऑगस्टचा हप्ता त्यात जमा न झालेला नाही. सणासुदीच्या काळात महिलांना लाभ मिळालेला नाही. ऑगस्ट महिना सरला गणपती बाप्पा विराजमान होऊन विसर्जनाची वेळ आली तरी महिलांना ऑगस्टचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. महिला पैसे मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यातच आता नवी अपडेट समोर येत आहे.

    पैशांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या महिलांसाठी खुशखबर म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे ३ हजार रुपये याच महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही महिन्यांचे पैसे याच महिन्यात जमा होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र दोन्ही हप्ते एकत्र येणार की दोन वेगवेगळ्या तारखांना हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis : ‘तुमच्यामुळे आमचं सरकार, पुढील पाच वर्ष…’; लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
    दरम्यान लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरु झाल्यापासून अनेक महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे गेल्या काही महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. योजनेच्या स्क्रूटिनी बद्दल भाष्य करताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, आमच्याकडे लाडक्या बहिणींसाठी हे रजिस्ट्रेशन होतं, ते 2 कोटी 63 लाखांपेक्षा जास्त होतं. सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवला होता.

    नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण असे एकत्र करून त्यांना 1500 रुपये दिले गेले. त्यात नमो शेतकरी योजनेचे 1000 लाख रुपये आहेत. स्क्रूटिनी केल्याने तो आकडा 2 कोटी 48 लाखांवर आला असल्याचे अदिती तटकरेंनी नमूद केले. स्क्रुटिनी केली नसती तर हा आकडा कमी झाला नसता, असेही त्या म्हणाल्या आहेत.

    दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या थेट धनलाभाचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला तसेच हजारो पुरुषांनीही बोगसपणे नोंदणीकरुन पैसे लाटल्याचे उघड झाले. दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी असणाऱ्या योजनेचा असा गैरफायदा घेत असल्याने कारवाई होणार असल्याचे मंत्री तटकरेंनी स्पष्ट केले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा