Ulhasnagar Girls Escape From Juvenile Reformatory: उल्हासनगर येथील महिला बालसुधारगृहातून सहा मुलींनी पळ काढला होता. त्यापैकी चार मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.
सुधारगृह व्यवस्थापनाची नजर चुकवून सहा मुलींचं पलायन, चार जणी सापडल्या
उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाशेजारी हे सुधारगृह आहे. या सुधारगृहात राहत असलेल्या सहा मुलींनी गेल्या आठवड्यात सुधारगृह व्यवस्थापनाची नजर चुकवत येथून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा महिला बाल विकास विभागाने पोलिसांच्या मदतीने या मुलींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. पळून गेलेल्या सहापैकी चार मुली सापडल्याचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी नमिता शिंदे यांनी सांगितले.
तू आवडत नाहीस, मावशीच्या मिठीत शांतता; पतीच्या बोलण्याने दुखावली, 4 महिन्यात नवविवाहितेचं टोकाचं पाऊल
चार मुलींना शोधण्यात यश, दोन मुली अजूनही बेपत्ता असल्याची माहिती
उल्हासनगर पोलिसांनी चार मुलींनी शोधले असले, तरी दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. या मुलींपैकी एक पश्चिम बंगालमधील, तर दुसरी आसाम येथील आहे. मानवी तस्करी प्रकरणातून या मुलींना सोडविण्यात आले होते. सुधारगृहात राहायचे नव्हते म्हणून पळ काढल्याचे सापडलेल्या मुलींनी पोलिस चौकशीदरम्यान सांगितले.
अनाथ, भिक्षेकरी, गैरप्रकरणातून सुटका करून आणलेल्या मुलींना दिला जातो आश्रय
या महिला बालसुधारगृहात अनाथ, भिक्षेकरी तसेच विविध गैरप्रकरणातून सुटका करून आणलेल्या १८ वर्षांखालील मुलींना आश्रय दिला जातो. इथे त्यांची राहण्याची, जेवणाची सोय केली जाते. त्याचप्रमाणे कायदेशीर गोष्टींबाबत त्यांना मदतही केली जाते.
या कारणांमुळे सुधारगृह झाले होते नकोसे, मुलींनी तक्रारींचा पाढाच वाचला
सुधारगृहातील अस्वच्छता, महिला अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त काम करायला लावणे अशा तक्रारी सुधारगृहातील मुलींनी केल्या आहेत. बालविवाह प्रकरणातील एका मुलीला येथे ठेवण्यात आले होते. त्या मुलीला परत घरी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांकडे सुधारगृह व्यवस्थापनाने लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला होता.

