मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी जरांगेंनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले. मात्र आता मुंबई हायकोर्टाने दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.