• Sun. Jun 7th, 2026
    इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल हा मुद्दा महत्त्वाचा : अशोक चव्हाण

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    खासदार अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा विषय लवकर संपला पाहिजे. त्यात तोडगा निघाला पाहिजे. हीच भूमिका मी समितीचा अध्यक्ष असताना होती, आजही तीच भूमिका आहे. मला खात्री आहे विखे पाटील यात लक्ष घालतील आणि कायद्याच्या चौकटीत…बसणारं आरक्षण राहिलं पाहीजे, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता हे…आरक्षण कसं देता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे असंही ते यावेळी म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed