Wardha Accident News : वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यात १५ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झालाय. भरधाव टिप्परची स्कूटीला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. एकाचा मृत्यू तर एकजण गंभारी जखमी झाला आहे.
वर्धा शहरातील भगतसिंग चौक येथे गिट्टी घेऊन येत असलेल्या टिप्परची स्कूटीला धडक लागली. यात टिप्परमध्ये समोरून ही स्कूटी बाईक टिप्परच्या समोरच्या भागात शिरली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती आहे. मृतक बालकाचे नाव आयुष संजू मांडवे असं असून तो सावंगी टी पॉईंट परिसरात राहणारा आहे. 15 वर्षाचे वय असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी निखिल प्रफुल मांडवे हा 15 वर्षाचा असून तो द्वारका नगर सावंगी मेघे येथे राहणारा आहे. अपघातात दोन्ही पायाला जबर मार लागला आहे. त्याची सावंगी रुग्णालयात मृत्युंशी झुंज सुरू आहे. अपघात घडताच भगतसिंग चौकात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. राम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी टिप्पर जप्त केला असून तपास सुरू आहे.
‘सरकार इंग्रजांपेक्षा बेक्कार, पिण्याचं पाणी, शौचायले, चहा, जेवणाची दुकानं बंद’, मनोज जरांगेंचा घणाघात
जालन्यात भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
जालना येथे एक मोठा अपघात घडला आहे. टेंभूर्णी-राजूर रोडवरील शिवार परिसरात एका कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती कार विहिरीत जाऊन पडली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार एका रुग्णाला उपचारासाठी सुलतानपूरला घेऊन जात होती आणि याच दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे.
Jalna Accident: नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत जाऊन कोसळली, पाच जणांचा मृत्यू, जालन्यात भीषण अपघात
जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी-राजूर रोडवरील गाडेगव्हान फाट्याजवळ हा भयंकर अपघात घडला. ह्युंदाई कंपनीची आय 20 गाडी फुलंब्री तालुक्यातील गुंगी गेवराई येथून ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले, निर्मला सोपान डकले (रा.गुंगी गेवराई),पद्माबाई लक्ष्मण भामीरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण भामीरे (रा. कोपर्डा ता. भोकरदन) आणि चालक असे पाच जण नातेवाईकासोबत पॅरलेसिस उपचार घेण्यासाठी मेहकर तालुक्यातील सुलतानपूर जाण्यासाठी निघालेले होते.

