Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आज सकाळपासून घडलेल्या घडामोडींवरुन सरकारवर निशाणा साधला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना प्रशासनाकडून आंदोलनासाठी एक दिवसाची मुदतवाढ मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आझाद मैदानावर आलेली आंदोलक वैतागून निघून जावीत यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकारने बंद केली, शौचालये बंद केली, चहा आणि नाष्टाची दुकाने तसेच जेवणाची हॉटेल बंद ठेवली, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली.
“सरकारने काय केलं ते मला माहीत नाही. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे, हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने असली डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं. मराठ्यांचं मनं जिंकणं गरजेचं आहे. मी सकाळीसुद्धा तेच सांगितलं आणि आता सुद्धा तेच सांगतोय. सरकारला आता अशी योग्य संधी आहे, गोरगरिबांची मनं जिंकण्याची योग्य वेळ आहे. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठे विसरणार नाहीत, जर त्यांनी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिलं. माझा गरीब मराठा मरेपर्यंत विसरणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.
‘आंदोलन मोडायचं की मला गोळ्या झाडायच्या हे…’
“तुम्ही एक-एक दिवस परवानगी दिली तरी मागण्या मिळेपर्यंत उपोषण होणार आहे आणि तुम्ही कायमस्वरुपी दिली तरी हे उपोषण मागण्यांची अंमलबजावणी होईस्तोर होणार आहे. ही नाटकं का खेळायची? सिद्ध झालं की, परवानगी देणं सरकारच्या हातात आहे. हे आंदोलन मोडायचं की परवानगी द्यायची की मला गोळ्या झाडून मारायचं हे सरकारच्याच हातात आहे. पोरं रस्त्याला आडवायचे हे सरकारच्या हातात आहे. तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तर पोरं सुद्धा काही करत नाहीत”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार’
“जसं पोलीस बांधव आढाव घेतात तसं आमच्याही माहिती आहे. सरकारने शौचालयाचे कुलुप लावून दारं बंद केली, पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की, चहाचे, नाष्टाचे आणि जेवणाचे दुकानंदेखील बंद केले. त्यामुळे आंदोलक हे सीएसटीला बसले होते. त्यामुळे हे प्रोब्लेम होत आहेत. जेवायला मिळू नये, चहापाणी मिळू नये आणि मराठ्यांनी वैतागून निघून जावं, असे प्रयत्न आहेत. तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार झाले”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा