Laxman Hake On Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाला सुरूवात केली आहे. या आंदोलनाला अनेक आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिलाय. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
मनोज जरांगे यांनी मुंबईला निघताना हा राजकीय अजेंडा असल्याची स्क्रिप्ट फोडली, जरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी, आम्ही आजपर्यंत म्हणायचो विरोधी पक्ष सामील असेल, पण मी आता जबाबदारीने सांगतो. सरकार उलथवण्यासाठी विरोधी पक्षाचे जसे आमदार, खासदार सामील आहेत तसेच अजित पवारांचे आमदार, खासदारही यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगत आहे, असं म्हणत हाकेंनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांच्यामागे कोणाची ताकद? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; त्यांचं…
दरम्यान, मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार ज्या दिवशी जरांगेकडून आई-माई काढली गेली, याच्याशी सहमत आहेत का? तुम्ही कायद्याचं आणि संविधानाचं बोला, ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा त्यांना ओबीसी आंदोलनाचं काय करायचं? अजित पवार यांचे आमदार जरांगेंना पाठिंबा देत आहेत म्हणजे अजित दादाही त्यांना पाठिंबा देतायेत. मुख्यमंत्र्यांना ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असाच त्याचा अर्थ निघतो. आम्हालाही आता सज्ज झालं पाहिजे, सरकार जरांगे सारख्या माणसाला पायघड्या घालत असेल तर आम्हालाही भूमिका घ्यायला पाहिजे, Laxman Hake यांनी म्हटलं आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी: मराठा आंदोलनामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद, पर्याय मार्ग कोणते? वाचा संपूर्ण यादी
जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार सरकार अस्वस्थ आणि बदण्याचा प्रयत्न करतायेत. आरक्षण हा विषय नाही, जरांगे यांची ही मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण संपलं असेल, असेओबीसींचं आरक्षण हे शासन, राज्यकर्त्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी आहे. ज्यांच्यापासून हे संरक्षण पाहिजे तेच लांडगे या कळपात घुसले तर या मेंढरांचं काय होईल? आमदार, खासदार, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते याची कल्पना असायला हवी. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला रसद सर्व पक्षीय आमदारांनी पुरवली, ओबीसींचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम आहे. पन्नास टक्के ओबीसी एकत्रित झाला तर तुमचं काय होईल? सर्वांची एकी करणं अवघड आहे याची आम्हाला कल्पना असल्याचं हाके म्हणाले.

