Beed Crime News : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माय-लेकीसह तिघींना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काही जागेच्या कारणावरुन ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मारहाणीचे हे दृष्य मन विचलित करणारे आहेत. जीव वाचवण्यासाठी त्या आकांतने ओरडत होत्या, तरीही राक्षसी वृत्तीच्या नराधमांना कसलीही दया आली नाही. या हल्ल्यामध्ये दोघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
Virar Building Collapse : महाराष्ट्रात हळहळ! विरार दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जणांचा अंत, ३६ तासांनंतर आणखी दोन मृतदेह सापडले
रिजवाना शेख बबनीन आणि शेख निलफोर शेख हरून या तिघींना गावातीलच चार ते पाच जणांनी संगणमत करून बेदम मारहाण केली. घराचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून हा वाद झाला आणि या वादानंतर यांना ही अमानुष मारहाण झाली आहे. महिलांना अमानुष मारहाण होत असल्यानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याचं समोर येत आहे. अशा परिस्थितीत पोलिस प्रशासन काय पाऊले उचलणार? आता हे पाहणं महत्वाचं आहे.
बीडमध्ये क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या तरुणाला संपवलं
दरम्यान, काल एका सराईत गुन्हेगाराची बीडमध्ये हत्या करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे अविनाश शंकर देवकर (वय ३५) याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना रात्री साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली असल्याचं समोर आलं आहे.
Manoj Jarange Protest: मराठा मोर्चावर शोककळा! हार्ट अटॅकमुळे आंदोलकाची धक्कादायक एक्झिट, मनोज जरांगे हळहळले, म्हणाले…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अविनाश देवकर यांचा मृतदेह स्वाराती रुग्णालयात आणण्यात आलं असून पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत. या घटनेने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.

