CAG report on Water Mumbai Railway Stations : रेल्वे बोर्डाने स्थानकांवर प्रवासी सुविधा पुरवण्याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. प्रवासी सुविधा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांतून अपेक्षित लाभ मिळाले आहेत की नाही, याचे मूल्यांकन करण्यासाठी हे लेखापरीक्षण करण्यात आले, असे कॅगकडून सांगण्यात आले.
कूलरमधील पाण्याच्या नमुन्यांत ई-कोलाय
दक्षिण रेल्वेच्या कोइम्बतूर आणि पलक्कड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, पूर्व रेल्वेच्या माधवपूर या स्थानकांवरील कूलरमधील पाण्याच्या नमुन्यांत ई-कोलाय आढळला. सर्व क्षेत्रांमधील ५१२ बिगर उपनगरीय श्रेणीतील स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी रेल्वेच्या प्रसाधनगृहांमध्येही अस्वच्छता आढळून आली. अहवालात २०१९-२० ते २०२३-२०२४ या कालावधीतील प्रकरणांचा, तसेच यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या प्रकरणांचा आणि आवश्यक तिथे २०२३-२०२४नंतरच्या प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, बिगर उपनगरीय गटात ५,९०८ रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. भारतीय रेल्वेने या श्रेणीत २०२३-२४मध्ये दररोज ७,४२४हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या चालवल्या आणि २९२.४ कोटी प्रवाशांची वाहतूक केली, असे अहवालात नमूद केले आहे.
यंदाचा जुलै सर्वाधिक उष्ण, चढ्या तापमानासह अतिवृष्टी, पूर, वणव्यांचा तडाखा; कारण काय?
अहवालात काय म्हटलं आहे?
रेल्वे बोर्डाने स्थानकांवर प्रवासी सुविधा पुरवण्याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. प्रवासी सुविधा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांतून अपेक्षित लाभ मिळाले आहेत की नाही, याचे मूल्यांकन करण्यासाठी हे लेखापरीक्षण करण्यात आले, असे कॅगकडून सांगण्यात आले. निवडलेल्या ५१२ स्थानकांपैकी ४५८ स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा पुरवण्यात त्रुटी होत्या. अशा स्थानकांचे प्रमाण ८९ टक्क्यांहून अधिक आहे. ‘एप्रिल २०१८ मध्ये, रेल्वे बोर्डाने एनएसजी-१ ते एनएसजी-६ या श्रेणींमधील स्थानकांसाठी ‘किमान आवश्यक सुविधा’, ‘शिफारस केलेल्या सुविधा’ आणि ‘अपेक्षित सुविधा’ निश्चित करणाऱ्या सर्वसमावेशक सूचना जारी केल्या होत्या. रेल्वे बोर्डाने ३१ ऑगस्ट २०१८पर्यंत सर्व स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य केले होते,’ असे अहवालात अधोरेखित करण्यात आले.
सुविधांची कमतरता आढळली
रेल्वे बोर्डाच्या एप्रिल २०१८च्या सूचनांनुसार, स्थानकाच्या श्रेणीचा विचार न करता सर्व स्थानकांवर सर्वप्रथम किमान आवश्यक सुविधा पुरवणे बंधनकारक करण्यात आले होते. यामध्ये पिण्याचे पाणी, प्रतीक्षा कक्ष, आसनव्यवस्था, फलाटांवरील छत, शौचालये, प्रसाधनगृहे, उंच फलाट, पंखे, पादचारी पूल, कचराकुंड्या, घड्याळे आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली यांचा समावेश आहे. एनएसजी-१ श्रेणीत येणाऱ्या सीएसएमटी, हावडा, सियालदह, नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही बसण्याची व्यवस्था, स्वच्छता सुविधा, कचराकुंड्या आणि ‘इलेक्ट्रॉनिक ट्रेन इंडिकेटर बोर्ड’ यांसारख्या सुविधांची कमतरता असल्याचे आढळून आले.
Sujay Vikhe Patil : डोनाल्ड वेडा माणूस, ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, लोकं दारू जास्त प्यायला लागले, सुजय विखेंचा अजब दावा
अहवालातील ठळक मुद्दे
सन २०२२-२३मध्ये आठ क्षेत्रांमधील ४९ स्थानकांवरील आणि २०२३-२४मध्ये नऊ क्षेत्रांमधील ५६ स्थानकांच्या फलाटांवरील पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा केले.
त्यामध्ये ई-कोलायसह आरोग्यास घातक जिवाणू आढळले.
२०२२-२३मध्ये चार क्षेत्रांमधील आठ स्थानकांवर आणि २०२३-२४मध्ये पाच क्षेत्रांमधील ११ स्थानकांवरील इतर जिवाणूविषयक चाचण्यांचे निष्कर्षही असमाधानकारक
