Lakhs Stolen from Dombivli Jewellers Shop : डोंबवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडून लाखोंच्या सोन्याची चोरी झाली आहे. या घटनेनं शहरात खळबळ तसेच भितीचं वातावरण पसरलं आहे.
शहरात चैनसाखळी चोरीं, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून चोरट्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे सर्वत्र विणले गेले असले तरी चोरट्यांना सीसीटीव्हीचे देखील भय उरलेले नसल्याचे दिसत आहे. डोंबिवली जवळील सागाव परिसरात असलेल्या चंदन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात सोन्याचे दागिने आर्कषक पद्धतीने मांडून ठेवल्याची रेकी करत चोरट्यांनी शुक्रवारी रात्री या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या बंद पडलेल्या कंपनीच्या बाजूने भिंतीला भगदाड पाडले. मजबूत बांधकाम असलेल्या या भिंतीत असलेल्या खिडकीचे लोखंडी बार गॅस कटरच्या मदतीने कापून काढत मजबूत भिंत तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजप अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यातही मेंदू नाही; राऊत बोलता-बोलता बरंच बोलले
यानंतर दुकानात असलेले जवळपास ५ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच मालकाचे डोळे विस्फारले. भिंतीला भगदाड पाडून आत शिरलेला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजसह डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून या चोरट्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
आमदाराच्या आईला हार्ट अटॅक
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या वैद्यकीय सेवेतील तत्परतेसाठी ओळखले जातात. एकनाथ शिंदे यांच्या याच संवेदनशीलतेचा अनुभव पुन्हा एकदा आला असून त्यांच्या तत्परतेमुळे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आईचे प्राण वाचले आहेत. आमदार बांगर यांच्या आईला हृदयविकाराचा त्रास होत होता. शिंदे यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू झाले.
Beed Crime : आंदोलनकर्त्याला साथ का दिली? कुटुंबावर जीवघेणा हल्ला, दगडाने आणि कोयत्याने महिलांना मारहाण; बीड हादरलं
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संतोष बांगर यांच्या आई, वत्सलाबाई बांगर यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस होते. त्यामुळे हिंगोलीतील डॉक्टरांनी वत्सलाबाई बांगर यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रस्तेमार्गे मुंबईत आणणं जोखमीचं ठरलं असतं. त्यामुळे आमदार बांगर यांनी लगेच एकनाथ शिंदे यांना फोन केला.

