• Wed. Jun 17th, 2026

    Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त मेट्रो मध्यरात्रीपर्यंत राहणार सुरु, असे आहे नियोजन

    Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त मेट्रो मध्यरात्रीपर्यंत राहणार सुरु, असे आहे नियोजन

    Mumbai Metro Ganeshotsav Timetable: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील वाहतूक कोंडी, गर्दी टाळण्यासाठी मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    mumbai metro 2A(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : गणेशोत्सव कालावधीत मुंबईनगरी अगदी रात्रंदिवस गजबजून जातो. भाविक रात्रभर शहरात फिरत असतात. हीच बाब लक्षात घेत, गुंदवली-दहिसर-अंधेरी पश्चिम ही मेट्रो-२अ व मेट्रो-७ गणेशोत्सवादरम्यान रात्री १२पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेऱ्यांमुळे २८ हजार अतिरिक्त प्रवासी उत्तर-पश्चिम व उत्तर मुंबईतील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत.

    गुंदवली ते दहिसर पूर्व ही मेट्रो-७ व दहिसर ते अंधेरी पश्चिम ही मेट्रो-२अ, या दोन्ही उन्नत मार्गिका संयुक्त रूपात धावतात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी लिमिटेडकडून (एमथ्रीडब्ल्यू) या मार्गिका चालवल्या जातात. या संयुक्त मार्गिकेने अलीकडेच एका दिवसातील सर्वाधिक ३.३४ लाख प्रवासीसंख्येचा आकडा पार केला. यानंतर आता ही मेट्रोमार्गिका गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहे. यानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या ११ दिवसांत अखेरची मेट्रो रात्री ११ऐवजी १२पर्यंत असेल. त्यामुळे १२ फेऱ्या वाढणार आहेत. या मेट्रोच्या एका गाडीची क्षमता दोन हजार २८० प्रवासी आहे.
    Maharashtra TimesGaneshotsav 2025: ऐक्याचा धागा, श्रद्धेची शिवण! ‘लालबागचा राजा’साठी मुस्लीम कारागिरांनी शिवला मखमली पडदा
    गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. या ११ दिवसांत लाखो भक्त विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी मुंबईत प्रवास करतात. त्यांना मध्यरात्रीपर्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससुविधा मिळणे ही आमची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या वातावरणात प्रवास करण्यासाठी मेट्रो ही भक्तांसाठी अधिक विश्वासार्ह परिवहन सेवा आहे. त्यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. तर, ‘गणेशोत्सवात प्रवासाची चिंता न करता उत्सवाचा आनंद घेता येईल’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
    Maharashtra TimesGaneshotsav 2025: कोकणवासी निघाले गावाला…; गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई महानगरातून जत्थे गावच्या दिशेने
    गणेशोत्सवातील फेऱ्या अशा…
    सोमवार ते शुक्रवार
    एकूण ३१७ फेऱ्या (या आधीच्या ३०५ फेऱ्यांमध्ये १२ फेऱ्यांची वाढ)
    गर्दीच्या वेळेत : दर ५ मिनिटे ५० सेकंदांनी एक गाडी
    गर्दी नसलेल्या वेळेत : दर ९ मिनिटे ३० सेकंदांनी एक गाडी
    शनिवारी
    एकूण २५६ फेऱ्या (या आधीच्या २४४ फेऱ्यांमध्ये १२ फेऱ्यांची वाढ)
    गर्दीच्या वेळेत दर ८ मिनिटे ६ सेकंदांनी एक गाडी
    गर्दी नसलेल्या वेळेत : दर १० मिनिटे २५ सेकंदांनी एक गाडी
    रविवारी
    एकूण २२९ फेऱ्या (या आधीच्या २१७ फेऱ्यांमध्ये १२ फेऱ्यांची वाढ)
    दर १० मिनिटांनी एक गाडी प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक असल्यास अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येतील

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा