• Fri. Jul 3rd, 2026

    दोन शिवसेनेचे शिलेदार एकाच व्यासपीठावर, एकमेकांवर तोंडसूख घेणाऱ्या नेत्यांनी काजू खाल्ले वाटून

    ByMH LIVE NEWS

    Aug 23, 2025
    दोन शिवसेनेचे शिलेदार एकाच व्यासपीठावर, एकमेकांवर तोंडसूख घेणाऱ्या नेत्यांनी काजू खाल्ले वाटून

    Ambadas Danve vs Sandipan Bhumare : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात दोन विरोधक गप्पांत रंगल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्री शिरसाठ, दानवे, भुमरे, जयस्वाल यांनी एकाच ताटातील काजूंचा आस्वाद घेतला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेत फूट झाल्यानंतर दोन्हीकडचे नेते एकमेकांवर तिखट शब्दांत टीका करतात. मात्र हेच नेते छत्रपती संभाजीनगरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमात एकत्र आले. ज्यामध्ये मंत्री संजय शिरसाठ, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल या नेत्यांचा समावेश होता. कार्यक्रम सुरू असताना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आयोजकांनी ठेवलेल्या काजूंवर ताव मारला. खात असतानाचा एकमेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

    काजू खाल्ल्याच्या प्रश्नावर नेते म्हणाले…

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, एका कार्यक्रमात 50 प्लेट ठेवलेल्या नसतात. एकच प्लेट असते प्रत्येक नेत्यांसाठी वेगवेगळे नसते. त्यामुळे एकाच यात आम्ही खुशीने खाल्लं असा अर्थ होत नाही. काजू फार गोड लागले नाही, असं दानवे म्हणाले.
    Maharashtra Timesराज ठाकरेंना शिवीगाळ, मनसैनिक भडकले; परप्रांतीय तरुणाच्या वॉशिंग सेंटरची तोडफोड
    खासदार भुमरे म्हणाले, विकासाच्या कामांमध्ये आम्ही एकत्र येतो. राजकारणात विषय येतात तेव्हा वेगळे असतो. दानवेंना काजू गोड नसते लागले, तर त्यांनी खाल्लेच नसते. सगळं गोड लागलं दानवेंना. ड्रायफूट शरीरासाठी चांगले असतात, त्यामुळे खाल्ले पाहिजेत. सगळ्यांनी मिळून खाल्ले पाहिजेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला त्यामुळे पुढे देखील गोड लागेल, असा मिश्कील टोलाही खासदार भुमरेंनी लगावला.दरम्यान, दानवेंनी सरकारच्या कामावर शंका उपस्थित करत म्हटले की, आज वॉटर ट्रीटमेंट प्लँटचा शुभारंभ केवळ झाला आहे. मला सरकारने उत्तर द्यावं की, यातून किती दिवस पाणी मिळणार आहे. पाण्याचे दिवस काही बदलणार आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करण्याचं काम सुरुय, अशी टीकाही दानवेंनी केली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा