Mumbai News : गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेने १५ ठिकाणी वेगमर्यादा हटवल्यामुळे लोकल प्रवास वेगवान झाला आहे.
पायाभूत सुविधांची कामे करताना तात्पुरती तसेच कायमस्वरूपी वेगमर्यादा घालण्यात येते. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान पश्चिम रेल्वेची सहावी मार्गिका सुरू करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ पासून वेगमर्यादा लागू करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्याने ती शिथिल करण्यात आली.
वांद्रे टर्मिनसकडे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून वळवण्यात आल्या. यामुळे मेल-एक्स्प्रेससह लोकल फेऱ्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा झाली. पश्चिम रेल्वेवरील रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान पूल क्र. ५ व पूल क्र. ६१ सह कांदिवलीजवळ पूल क्र. २० यांचे ब्रिटीशकालीन स्क्रू पायलिंगचे बांधकाम हटवून त्याची आरसीसी पद्धतीने पुनर्बांधणी करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ वेगमर्यादा हटवलेली ठिकाणे- एकूण चार
स्थानक -ठिकाणे – वेगमर्यादा (ताशी)
खार-सांताक्रूझ – एक – ६० किमी
सांताक्रूझ-विलेपार्ले – एक – ७५ किमी
सांताक्रूझ-खार – दोन – ७५ किमी आणि ६० किमी
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महामार्गांवर टोलमाफी, दर्शन पासचीही सुविधा
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान वेगमर्यादा हटवलेली ठिकाणे-एकूण ११
स्थानक -ठिकाणे – वेगमर्यादा (ताशी)
माटुंगा रोड-माहीम पाचवा मार्ग – तीन – १५ किमी, ५० किमी आणि १५ किमी
माहीम-वांद्रे पाचवा मार्ग – दोन – ३० किमी आणि १० किमी
वांद्रे टर्मिनस ते सांताक्रूझ – दोन – ४५ किमी आणि ४५ किमी
अंधेरी यार्ड परिसर – एक – ५० किमी
सांताक्रूझ ते वांद्रे – एक – ७५ किमी
वांद्रे – माहीम – एक – १५ किमी
जोगेश्वरी-गोरेगाव – एक – ५५ किमी

