राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचं थैमान सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने आज दुपारी धोका पातळी गाठली असून…प्रशासकीय यंत्रणा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही आपत्तीचा…सामना करण्यासाठी सज्ज आहे. गुरुवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाने थोडी…उसंत घेतल्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी आता फक्त एकाच…दरवाज्यातून विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्याने राजाराम बंधारा….इथं पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फुटांवर स्थिर आहे.
कोल्हापूरच्या पंचगंगेने गाठली धोका पातळी, अनेक भागात पूरस्थिती निर्माण!
