• Sat. Mar 7th, 2026

    50 खोके म्हणताच आमदारांच्या पत्नी अंगावर धावल्या अन्.., विरोधकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध

    50 खोके म्हणताच आमदारांच्या पत्नी अंगावर धावल्या अन्.., विरोधकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध

    पन्नास खोके असा उच्चार होताच आमदारांच्या पत्नी अंगावर धावल्याची घटना घडली आहे. विरोधकांनी या घटनेविरोधात काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यांत रस्त्यांची झालेली दुरावस्था, प्रलंबित प्रश्न, मुरुड मिठेखार येथे दरड कोसळून झालेल्या घटने बाबत प्रशासनाला जाब विचारला, स्थानिक प्रतिनिधी करतात काय ? असा प्रश्न उपस्थित केला. 50 खोके असे म्हटल्यानंतर शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर आमदारांच्या पत्नी मानसी दळवी अंगावर धावून आल्या आणि वाद निर्माण झाला. याचा निषेध करण्यासाठी आज अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत मानसी दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काळे झेंडे बॅनर आणि घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नेमकं काय घडल?
    रायगडमधील मुरूड परिसरात दरड कोसळली या दुर्घटनेमध्ये विठा गायकर या महिलेचा मृत्यू झाला. दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तेथे शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवीही दाखल झाल्या. तेथील आढावा घेतना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, ही बाब गंभीर आहे यामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. किती दिवस तो चिखलाचा रस्ता आणि सर्व सहन करणार. आमच्या जीवनाची किंमत आहे की नाही. गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या हे काय पन्नास खोके कोण काय? हे सर्व घाणेरडं चाललंय राजकारण आणि समाजकारण. त्यानंतर मागे उभ्या असलेल्या मानसी दळवी या पाटील यांच्या अंगावर धावून गेल्या. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.

    अधिकाऱ्यांना मारहाण
    2024 मध्ये मानसी दळवी यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. अलिबागमधील आरसीएफ शाळा बंद करत त्यातील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजनचा घाट घातला जात होता. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे बोलले जात होते.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा