• Fri. Mar 6th, 2026
    Maharashtra Rain: राज्यात मुसळधार पावसाचे २४ तासांत १० बळी; ५२ प्राणी दगावले, आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

    Maharashtra Rain Update: २४ तासांत मुसळधार पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला, तर ५२ जनावरे दगावल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

    mumbai rain news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत पावसामुळे जवळपास १० जणांचा मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. यात नांदेड येथे पुरात वाहून गेल्याने चार जणांचा, मुंबई शहरात भिंत कोसळून दोघांचा आणि सिंधुदुर्गात पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. नांदेड येथे ५२ जनावरे वाहून गेल्याने दगावली. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यभरात चार हजार १४३ जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

    राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या दैनिक अहवालात ही माहिती देण्यात आली. या अहवालानुसार गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद मुंबई उपनगरात करण्यात आली असून, मुंबई उपनगरात २०९ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात १७५ मिमी, तर रायगड येथे १२०.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनुक्रमे १०७.४ मिमी आणि ९८.२ मिमी पावसाची नोंद झाली.
    Maharashtra TimesGaneshotsav 2025 : खुशखबर! गणेश मंडळांचा वीजभार कमी होणार, महावितरणकडून मोठी घोषणा; नेमकी योजना काय?
    राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्यभरात एनडीआरएफच्या एकूण १८ तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय एसडीआरएफच्या सहा तुकड्या सज्ज आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात आतापर्यंत चार हजार १४३ जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहेत. यात रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक, एक हजार ३३२ जणांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात ४७१ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले असून, त्यांचे स्थलांतर महापालिका निवारागृहात करण्यात आले आहे.
    Maharashtra TimesMumbai Rains Update: चिंता मिटली! मुंबईकरांना सुखावणारी बातमी, हवामान विभागाकडून पावसाचा नवा अलर्ट
    जगबुडी धोक्याच्या पातळीवरच
    रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि रायगड जिल्ह्यातील अंबा, सावित्री या नद्या धोक्याच्या पातळीवरूनच वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, कोदवली नद्यांनी इशारा पातळी गाठल्याची माहिती प्रशासनाने दिली

    अलमट्टीतून प्रवाह वाढणार?
    अलमट्टी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस आणि कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर ब्रिज) यांमधून होणारा विसर्ग लक्षात घेता, अलमट्टी धरणाकडे येणारा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. नदीतील सध्याच्या प्रवाह दोन लाख क्युसेकवरून २० ऑगस्ट रोजी अडीच लाख क्युसेकपर्यंत वाढवला जाईल.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा