Ratnagiri Heavy Rainfall Update: राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. हा पाऊस पुढील दोन दिवस असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
19 ऑगस्ट रोजी मंगळवारी पुढील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागाचा समावेश आहे. तर 20 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापुर घाट या भागासाठी ऑरेंज अलर्ट आहे. 19 ऑगस्ट रोजी मंगळवारी नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, पुणे, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आहे.
हवामान वेगाने दिलेल्या इशारानुसार रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना पावसाने सोमवारी तुफान झोडपून काढल आहे. यामुळे खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर होतं, खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. संगमेश्वर शास्त्री नदी व राजापूर येथील कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. पावसामुळे सोमवारी सकाळी खेड दापोली राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद दिवसभर बंद होता. खेड शहरात मटण मार्केट जवळ पाणी आलं होतं नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना व्यापाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या झोपडपट्टीतील काही सुवर 145 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आल होते. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांकडे जाणारी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे खेड शहर दिवसभर पुराच्या उंबरठ्यावर होते. खेड प्रांताधिकारी वैशाली पाटील व मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी बोटी,होड्या आदी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली होती.रत्नागिरी तालुक्यात उक्षी परिसरात काही ठिकाणी ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान रत्नागिरी व कोल्हापूर जोडणारा महत्त्वाचा असलेला आंबा घाटात दरड कोसळल्याने या घाटातील वाहतूक काहीवेळ पूर्णपणे ठप्प झाली होती. संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली युद्ध पातळीवर येथील जेसीबी यंत्रणेच्या मदतीने दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
चिपळूण वशिष्ठी नदीची इशारा पातळी ५ मी आहे. कोळकेवाडीतून डॅममधील पाणी कमी करून होणारी विजनिर्मिती यावर चिपळूण तालुका प्रांताधिकारी डॉ.आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी समन्वय साधून नियंत्रण ठेवल्याने वाशिष्ठी नदीला पूर आला नाही.तसंच चिपळूण येथे आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेला नलावडे बंधारा हा चिपळूण शहरवासींसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. मात्र चिपळूण येथे काही ठिकाणी शहरात सखल भागात पाणी आलं होतं. दरम्यान दापोली नागरगुडी येथील घराला पाण्याचा वेढा पडल्याने शिंदे कुटुंबाला स्थलांतरित करण्यात आलं होत. दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव येथे विद्यानगर, श्रीरामनगर या खलाटी परिसरात रस्त्यावर पाणी आलं होते तर इथल्या घरांनाही पाण्याचा वेढा पडला होता. या सगळ्या परिस्थितीवर ठेवून वेळप्रसंगी स्थलांतराची तयारी ठेवली आहे अशी माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली.
खेड तालुक्यात गोवा महामार्गावर असलेल्या आवाशी गावात पाणी शिरलं होत जिल्हा परिषद शाळा व दोन वाड्यांमधील घरांना पाण्याचा वेढा पडला होता. महामार्गाच्या ठेकेदार कंपनीने केलेल्या चुकीच्या कामामुळे हा प्रकार घडल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मागील चार-पाच दिवस संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.गड नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.नदीचे पाणी कणकवली-मालवण राज्य मार्गावर आल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी सायं ४ वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंचांवरून ३ फुटापर्यंत उघडून १९,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आले. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण २१,३०० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली होती. महाड तालुक्यात तुफान पाऊस, सांदोशी बाळे गावचा संपर्क तुटला होता.रायगड आणि करमर खोऱ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे नदीचे पाणी वाढलं होत. बिरवाडी कुंभारवाडा आणि खरवली बांधाऱ्यावर पाणी आले होते त्यामुळे महाड बिरवाडी कुंभारवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत पावसाची दोन पुढील प्रमाणे झाली आहे. मंडणगड -124,खेड 170, दापोली 154,चिपळूण 147.11, गुहागर 113, संगमेश्वर -163.33,रत्नागिरी – 119.55,लांजा 116.66,राजापूर – 99.62
