Sanjay Raut: काही जण दिल्लीत जाऊन मटक्याचा आकडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तो लागताना दिसत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याचे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘वास्तविक लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. एकेकाळी सरकारदेखील लॉटरी चालवत होते. पण आता राज्यात बेकायदा मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असले तरीही आकडा लावला जात आहे. गणेश नाईक यांनी लॉटरी शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात ‘मटका’ हा शब्द असावा. मुख्यमंत्रिपदासाठी मटका लागला असावा, असे त्यांना म्हणायचे असावे’, असे ते म्हणाले. ‘मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळ, दुपार आणि रात्री असे वेगवेगळे आकडे निघतात. हे आकडे सांभाळता येत नाहीत आणि त्यातही यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला आहे. ते तिथे जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या यांचा आकडा लागत नाही’, असेही राऊत म्हणाले.
Devendra Fadnavis: पालिकांची हंडी आम्हीच फोडणार; दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुंकले रणशिंग
मंत्री गिरीष महाजन यांच्या विधानावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘स्वत:च्या खाली काय जळतेय हे त्यांनी पाहावे. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांचे काय हाल असतील, ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. उद्या ठाकरे बंधू राजकीयदुष्ट्या एकत्र आल्यावर त्यांना कळेल. सध्या फडणवीसांच्या भोवती जे चोर-दरोडेखोर आहेत, त्यांना सत्ता नसल्यावर रस्त्यावर फिरणे कठीण होईल’, असे ते म्हणाले.
ठाकरे बंधूंकडून एकजुटीने तयारी, आता BMC साठी फडणवीसांनीही शड्डू ठोकला; आव्हान देत म्हणाले…
‘निष्क्रियतेचे बळी’
‘विक्रोळी पार्कसाइट विभागात शनिवारी पहाटे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत शालू व सुरेश मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला, तर आरती आणि ऋतुराज मिश्रा गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले हे स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिका आणि म्हाडा प्रशासनाच्या निष्काळजीचे बळी आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने केला. ‘पार्कसाइट परिसरात म्हाडा संरक्षण भिंत उभारणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले होते. परंतु, आजपर्यंत त्या कामाचा मागमूसही नाही. लोकप्रतिनिधींकडूनही याबाबत कुठलाही पाठपुरावा करण्यात आला नाही. दरड दुर्घटनेतील मृत्यू हे त्यांच्या उदासीनतेचे बळी आहेत,’ असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शप) मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी या दुर्घटनेनंतर केला. ‘दोन निरपराध जीव जाऊनही हे लोकप्रतिनिधी दहिहंडी उत्सवात रमले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी भेटही दिली नाही,’ असेही ते म्हणाले

