• Tue. Jun 16th, 2026

    Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी वाढता दबाव, सरकार कधी निर्णय घेणार? कृषीमंत्री स्पष्टच बोलले!

    Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी वाढता दबाव, सरकार कधी निर्णय घेणार? कृषीमंत्री स्पष्टच बोलले!

    Dharashiv Rain News: धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती आणि घरांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज दौऱ्यावर होते. त्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून, नुकसान भरपाई लवकर देण्याचे निर्देश दिले आहेत.

    शेतकरी कर्ममाफीसाठी वाढता दबाव, सरकार कधी निर्णय घेणार? कृषीमंत्री स्पष्टच बोलले!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धाराशिव: मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचं आणि घरांचं नुकसान झालं आहे. या नुकसानीची दखल घेत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि वाशी तालुक्यातील घोडकी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर, कृषीमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, “शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी तातडीने कारवाई करा,” असे निर्देश दिले आहेत. यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीवरही भाष्य केलं आहे.

    पत्रकारांनी विचारलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “मी शेतकरी पुत्रच आहे. माझा जन्म देखील शेतकरी कुटुंबातच झाला आहे. आज मी उठल्यावर मला शेती दिसते आणि झोपताना देखील शेती दिसते. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, या माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माहिती आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीची जाण मला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात योग्यवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे निर्णय घेतील,” असं भरणे यांनी स्पष्ट केलं आहे.

    Maharashtra Timesप्रतारणा, फितुरी, जयंत पाटील यांनी भर मंचावर डिवचलं, अजित पवार म्हणाले…

    धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

    अचानकपणे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. काही गावांमध्ये जनावरे दगावल्याच्या आणि घरांचेही नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंबंधीही पंचनामे करण्याच्या सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत.

    “शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार”

    शेतकऱ्यांचे दुःख ऐकून घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचंही म्हटलं आहे. याचबरोबर, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा