• Mon. Jun 15th, 2026
    मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; कोकणासह ‘या’ भागांत ॲलर्ट, काय सांगतो IMDचा अंदाज?

    Rain Alert In Mumbai: मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज एमआयडीने वर्तविला आहे. ठाणे, रायगड, पालघरसह आणखी काही भागांना अॅलर्ट जारी केला आहे. कसं असेल आजचं हवामान?

    mumbai rain new (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबईत बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि पावसाच्या हलक्या सरींनी उपस्थिती लावली. मात्र, आज, गुरुवारी महामुंबई परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुंबई , ठाणे, पालघर रायगड परिसराला गुरुवारसाठी यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर वीकेंडलाही महामुंबईत हीच स्थिती कायम राहू शकते. भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

    दक्षिण कोकणात वीकेंडसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी मुंबईमध्ये पावसाळी वातावरणामुळे तापमानाचा दिलासा मिळाला. मंगळवारी कुलाबा येथे ३१.५, तर सांताक्रूझ येथेही ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. बुधवारी यात घट होऊन कुलाबा येथे २८.८ तर सांताक्रूझ येथे २९.७ अंश से. कमाल तापमान नोंदवले गेले.
    Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’कडे पाठ; पाच महिन्यांत एकही नवा अर्ज नाही; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी
    बुधवारचा पाऊस
    कुलाबा : ३.४ मिमी
    सांताक्रूझ ३.३ मिमी

    पावसाचा अंदाज असा…
    शुक्रवार ते रविवार : ठाण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार
    शनिवार, रविवार : मुंबईत मुसळधार
    शनिवार, रविवार : रायगड, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट
    रविवार : सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार
    पुणे, सातारा, कोल्हापूरः दोन दिवस ऑरेंज अलर्ट
    मराठवाडा आणि विदर्भ: पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार
    अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ गुरुवारी ऑरेंज अलर्ट
    चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा रविवारी ऑरेंज अलर्ट
    Ajit Pawar On Meat Sale Ban : मांस विक्री बंदीमुळे वातावरण तापलं, अजित पवारांचंही मोठं विधान; अयोग्य म्हणत सरकारसमोरील पेच वाढवला
    सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस
    खरीप पिकांचे मोठे नुकसान

    आठवडाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे बक्षी हिप्परगे गावासह अनेक भागात सर्वत्र पुलावर पाणी आल्यामुळे या गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी केली आहे. गेल्या चार दिवसांत दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्या- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांत नदी आणि ओढ्यांना पूर आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा