Sanjay raut Press Conference : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी केलेल्या दाव्यासंदर्भातच आणखी एक खळबळजनक माहिती सांगितली आहे. पवारांना भेटलेले लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले होते, नेमकी काय चर्चा झालेली याबाद्दल राऊतांनी सविस्तरपणे सांगितलं आहे.
निवडणुकीसंदर्भात घोटाळे आहेत. मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यासारखी लोकं निवडणूक पैसा आणि सत्तेच्या बळावर चोरतात आणि हायजॅक करतात. त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केले आहेत. शरद पवारांनी महत्त्वाचा विषय मांडला, निवडणुकीपूर्वी काही लोकं त्यांना भेटले. १६० जागी विजय प्राप्त करून देतो आम्हाला विशिष्ट रक्कम द्या, अशी त्यांची मागणी होती. उद्धव ठाकरेंनाही काही लोकं भेटले होते, ते लोकसभेला आणि विधानसभेलाही भेटले होते. आम्ही त्यांना सांगितलं की, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे त्यांना म्हणाले की, देशातील वातावरण पाहता लोकसभा १०० टक्के आम्ही जिंकू,आम्ही महाराष्ट्रात विजय प्राप्त केला. आम्हाला घोटाळे करून निवडणूका जिंकायची गरज वाटत नसल्याचं संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मोठी बातमी: एकनाथ शिंदेंचे 4 नेते अडचणीत येणार? राऊतांनी थेट नाव घेतलं, CM फडणवीसांकडे चौकशीची मागणी
ते लोक पुन्हा विधानसभेला आले. तेव्हा आम्ही सांगितलं की, लोकसभेला आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालं आहे, विधानसभेतही आम्ही नक्की सत्तेत येऊ. तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की ६० ते ६५ अडचणीतल्या जागा सांगा ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देऊ. आम्हाला आवश्यकता वाटत नसल्याचं सांगितलं, त्यावर त्यांनी इतकं सांगितलं की जे समोर सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना मतदार याद्या आणि ईव्हीएमच्या माध्यमातून काम केलंय त्यामुळे तुमचं अपयश दिसतंय. आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरीहा आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर, आयोग आणि लोकशाहीवर होता. दुर्देवाने शरद पवार जे बोलत आहेत आणि उद्धव ठाकरे यांना भेटलेल्या लोकांच्या बोलण्यात तथ्य असावं असं दिसतंय असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

