• Tue. Mar 10th, 2026

    Pune News : पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

    Pune News : पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा

    Ajit Pawar Latest News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या धडाकेबाज कामाबाबत ओळखले जातात. आज पहाटे त्यांनी चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना मोठी घोषणा केलीय. चाकणला एक वेगळी महानगरपालिका होणार असल्याचं त्यांनी सुतोवाच केलं आहे.

    बीडनंतर अजितदादांचा पुणे दौरा, पहाटेपासून कामाला सुरुवात; वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे मोठी घोषणा केलीय. यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका आणि अन्य दोन महानगपालिका होणार असल्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच ‘बारामतीची तुलना चाकणसोबत करु नका’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    अजित पवार नेमकं काय म्हणाले?

    अजित पवार यांनी आज पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, ‘पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याच चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये १५०० छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यात साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात लाखोंच्या संख्येत वाहनांची ये-जा असते. या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. त्यामुळे चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    Uddhav Thackeray : इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची बोचरी टीका, तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे
    ‘तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे, आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत . जसं की रस्ता अंडरग्राउंड ड्रेनेज, अशा अनेक गोष्टी असतात. यामध्ये बँकांचे वर्ल्ड बँकेचे पैसे आणता येतात, केंद्र सरकारचा निधी आणता येतो, या प्रकारे आपल्याला करावे लागेल. काहींना आवडेल न आवडेल. मात्र, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात. मी देखील काम करताना पाहिलं आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या महापालिका आल्या, ठाणे महानगरपालिका एकटी होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिका झाली’, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    Buldhana News : घरातून निघाला, रेल्वे ट्रॅकवर आला; लोको पायलटला संशय, पण सगळं संपलेलं; बुलढाण्यात हळहळ
    पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. ‘मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका, चाकण भागात एक आणि हिंजवडी भागात एक महापालिका करावी लागणार आहे’, असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

    महाराष्ट्र डेस्क

    लेखकाबद्दलमहाराष्ट्र डेस्कमटा महाराष्ट्र डेस्क एक अनुभवी आणि जागरूक टीम आहे. ही टीम राज्य, जिल्हा, शहर आणि गाव पातळीच्या बातम्यांसह राज्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि स्थानिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवते. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या, विकास योजनांचा आढावा, स्थानिक राजकारणातील बदल आणि सांस्कृतिक घडामोडींचे तटस्थ व विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच या डेस्कचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बातमीला संदर्भासह सादर करून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे हा या टीमचा नेहमीच प्रयत्न असतो.… आणखी वाचा