Beed- Ahilyanagar Train Service: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माहितीनुसार, बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर मराठवाडा मुक्तिदिनी नियमित रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली असून, बीड-मुंबई मार्गही लवकरच सुरू होणार आहे. रखडलेल्या कामामुळे खर्चात वाढ झाली होती.
बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस बीडमध्ये होते. या वेळी त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. व्यापाऱ्यांपासून शहरातील डॉक्टरांशी बैठक घेऊन त्यांनी बीडच्या विकासाबाबत विविध घटकांशी संवाद साधला. येथील ग्रामदैवत कंकालेश्वर मंदिरात पहाटेच दर्शन घेऊन प्राचीन मंदिराच्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात असलेल्या क्रीडा सुविधांची पाहणी केली. क्रीडा संकुल विकास कामासाठी मिळणाऱ्या निधीचा व्यवस्थित विनियोग करण्यासाठी आपण लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, परळी येथील वैद्यनाथ मंदिर विकास आराखडा या संदर्भात त्यांनी बैठक घेतली.
Beed Crime : लग्नाला ८ वर्षे पूर्ण, अपत्य नसल्याने दुसऱ्या लग्नाचा विचार, सासऱ्याचा नकार, मेहुण्याचं लग्न ठरल्यावर…. बीडमधील त्या प्रकरणाचा निकाल
त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अहिल्यानगर -बीड-परळी रेल्वेमार्गाचा आढावा त्यांनी घेतला. या मार्गावरील अहिल्यानगर ते बीड काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात बीडपर्यंत रेल्वेची हायस्पीड चाचणी घेण्यात आली होती. रेल्वे घेऊन येणाऱ्या लोको पायलट व रेल्वे अधिकाऱ्यांचे बीडकर जनतेने स्वागत केले होते. त्या नंतर मात्र प्रत्यक्षात रेल्वे कधी सुरू होते याकडे लक्ष लागले होते. पवार यांनी गुरुवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवर संपर्क साधून नियमित रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली. काम पूर्ण झाले असल्याने बीड ते अहिल्यानगर रेल्वेमार्गावर नियमित रेल्वेसेवा येत्या मराठवाडा मुक्ती दिनी सुरू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर दिली. त्यामुळे बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
बीड-अहिल्यानगरनंतर बीड-मुंबई रेल्वेमार्ग लवकरच सुरू होईल. त्यामुळे आपले हक्काचे महायुतीचे हे सरकार बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असेही पवार या वेळी म्हणाले. अनेक वर्षे हा प्रकल्प रखडल्याने या रेल्वेमार्गासाठी खर्च वाढत जाऊन २८०० कोटींची आवश्यकता होती.
बीडकरांनी रस्त्याचे काम करा सांगताच दादा संतापले, जादूची कांडी नाही म्हणत अजित पवार चिडले
मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे बीडच्या शेजारील लातूर जिल्ह्यातील होते. त्यांनी प्रथम शेजारधर्म निभावत कामाचा अर्धा वाटा उचलण्यास मंजुरी दिली. मात्र, तरीही फारसे पैसे या प्रकल्पास मिळाले नाहीत. पण केंद्रात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी या २५ वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले व त्याचे काम प्रगतिपथावर आले.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४१३ कोटी या अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा रेल्वे प्रकल्प दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते.
