• Sat. Mar 7th, 2026

    पुढील २४ तास महत्त्वाचे! राज्यात मेघगर्जनेसह सरींची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांत अ‍ॅलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?

    पुढील २४ तास महत्त्वाचे! राज्यात मेघगर्जनेसह सरींची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांत अ‍ॅलर्ट जारी, काय सांगतो IMDचा अंदाज?

    Maharashtra Weather Update: ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,विदर्भाचा काही भाग आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

    maharashtra rain news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर फारसा नसला तरी शुक्रवारपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायलसीमाच्या जवळ हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागराच्या मध्य या पट्ट्यामध्ये पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रणालींमुळे राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वाढली आहे.

    गुरुवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तसेच मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे, पुणे जिल्ह्याचा घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, सोलापूर येथे गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे शुक्रवारी तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव येथे गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर या परिसरात मात्र हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
    Mumbai Fraud: तुम्हालाही जुन्या नोटा, नाणी जमावायचा छंद आहे का? पण ‘अशी’ चूक नकोच! मुंबईत महिलेला 8 लाखांना गंडवलं
    या पावसामुळे तापमानात फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग अशा १५ जिल्ह्यांत दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांदरम्यान नोंदले जात आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ३५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ५.१ अंशांनी अधिक होते.
    मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आजपासून हार्बरवर 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक, कसं असेल नियोजन? पाहा Timetable
    विदर्भात उकाडा वाढला
    विदर्भातील अनेक ठिकाणी गेले आठवडाभर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे विदर्भात उकाडा वाढला आहे. चंद्रपुरात मंगळवारी तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी २० मिनिटांचा पाऊस झाला. त्यामुळे काही काळ दिलासा मिळाला. दरम्यान चंद्रपुरात बुधवारी ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे ३५.५ अंश सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस येलो अलर्ट देण्यात आला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा