• Sat. Mar 7th, 2026
    Ajit Pawar: जाहीर ठिकाणी बोलताना तारतम्य बाळगा; अजित पवार यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान

    Ajit Pawar: जाहीर ठिकाणी बोलताना तारतम्य बाळगा, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

    ajit pawar (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : आपण चुकीचे वक्तव्य करतो आणि मग ते सर्व माध्यमांतून दाखवले जाते. समाजमाध्यमांची सध्या ताकद वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी तारतम्य ठेवून वागले-बोलले पाहिजे. आपल्या एका वक्तव्याने संपूर्ण पक्षाला फटका बसतो त्यामुळे भान ठेवून वागा,’ या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांचे मंगळवारी कान टोचले.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. याशिवाय धाराशिव, अहिल्यानगर, अकोला या जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अजित पवार बोलत होते.
    Devendra Fadnavis: मुंबई पालिका महायुतीच जिंकेल; ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
    ‘सत्तेच्या विरोधात जाऊन विकासकामे होत नसतात तर सत्तेत राहूनच नागरिकांची कामे होत असतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत त्याच्या कामाला लागा. पक्षातील नवा-जुना असा भेदभाव न करता पक्षाला यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे पक्षाला फटका बसू शकतो,’ असे ते म्हणाले. ‘जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले गेले पाहिजे,’ असे आवाहनही पवार यांनी केले.

    यावेळी कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, आमदार काशिनाथ दाते, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आदी उपस्थित होते.
    रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! अजनी-पुणे स्लिपर ‘वंदे भारत’ लवकरच रुळावर; कधी सुरु होणार? कोणत्या स्टेशन्सवर थांबणार?
    महामंडळाच्या वाटपासाठी समन्वय समिती

    महायुतीचे सरकार स्थापन झाले, तरीही अद्याप महामंडळाचे वाटप झालेले नाही. हे वाटप व्हावे यासाठी महायुतीतील घटकपक्षांची सहा सदस्यीय स्थापन करण्यात आल्याची माहिती या वेळी पवार यांनी दिली. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि उदय सामंत, तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून संख्याबळानुसार महामंडळांचे वाटप होईल, असे पवार म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा