• Thu. Mar 12th, 2026
    घराजवळ विजेचा धोकादायक खांब, विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्याचा करुण अंत

    Buldhana Farmer Tragic Death : बुलढाण्यात विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. धोकादायक विद्युत खांबामुळे दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेनंतर, वीज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अमोल सराफ, बुलढाणा : विद्युत कंपनीने केलेला हलगर्जीपणा एकाच्या जीवावर बेतला आहे. घरासमोर अवघ्या एक फूट अंतरावर असलेल्या खराब विद्युत खांबामुळे शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वीज कंपनीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा वानखेडे येथे घरासमोर फक्त एक फूट अंतरावर धोकादायक खांब होता. त्या धोकादायक विजेच्या खांबाच्या धक्क्याने एका ६० वर्षे वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजेंद्र नरसिंगराव देशमुख असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या जाण्याने देशमुख कुटुंब उघड्यावर आलं आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे.
    Sanjay Raut : आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले, त्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत; संजय राऊतांची टीका
    वीज कंपनीचे खामगाव कार्यकारी अभियंता, संग्रामपूर उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता वरवट बकाल वानखेडे गावचा विद्युत वायरमन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार तामगाव संग्रामपूर पोलीस स्टेशनमध्ये मृत शेतकऱ्याचे भाऊ विनोद देशमुख यांनी केली आहे. शेतकरी राहत असलेल्या वानखेड गावात विद्युत खांबावर असलेल्या वीज प्रवाहित तारेचं व्यवस्थापन अतिशय निष्काळजी पद्धतीने करण्यात आलं आहे. त्यामुळेच शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप केला जात आहे.
    Nanded News : हॉटेलमध्ये गेले ते रुममधून बाहेरच आले नाहीत, शिक्षकाची लॉजमध्ये बॉडी; नांदेडमध्ये खळबळ
    रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबावर अनेक वीज जोडण्या अवास्तवपणे करण्यात आल्या आहेत. संबंधित घटनास्थळी विद्युत खांब तळाला गंजून अक्षरश तुटण्याच्या स्थितीत आहे. असं असूनही वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही.

    गावकऱ्यांनी संग्रामपूर आणि खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता तसंच स्थानिक लाईनमन यांच्याकडे खराब झालेल्या विद्युत खांबाबाबत तक्रार दिली होती. विद्युत खांब स्थलांतर आणि वायरिंग दुरुस्तीसाठीही विनंती केली होती. तरीही वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी अक्षम दुर्लक्ष केल्याने दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत व नुकसान भरपाई देखील मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा