Shekap 78th anniversary MNS Raj Thackeray : कोणी या पक्षातून त्या पक्षात गेला, तर कुणी त्या पक्षातून या पक्षात आला, आपण म्हणतो काय झालं, तर तो व्हायरल झाला, असे व्हायरल महाराष्ट्रात खूप झालेत, असा टोला राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्यात लगावला.
राज ठाकरे काय म्हणाले?
अंगात ताकद नव्हती, मात्र तुमच्या आणि जयंत रावांच्या प्रेमाखातर इथे आलो. पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये सभा घेईन. काय झालंय ते डॉक्टर हल्ली सांगत नाहीत. पूर्वीचे आजार ताठ मानेने नाव सांगून समोर यायचे. हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फार वेगळं नाही. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून या पक्षात आला, आपण म्हणतो काय झालं, तर तो व्हायरल झाला. असे हे व्हायरल खूप झालेत, असा
टोला राज ठाकरे यांनी लगावला.जयंत राव म्हणाले फक्त मराठीवर बोला. शेकापच्या व्यासपीठावर मी पहिल्यांदा नाही, तर दुसऱ्यांदा येतोय. पाच वर्षांपूर्वी मी लोकसभेच्या प्रचारालाही आलो होतो, याची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली.
मुख्यमंत्र्यांवर टीका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यातील मुलांना हिंदी कसं शिकवता येईल, याचा विचार करत आहेत. पण महाराष्ट्रात जे कामधंद्याला येतात, त्यांना मराठी कशी येईल, याचा विचार नाही करत. महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचा विचारच नाही. याचं विदारक स्वरुप म्हणजे रायगड जिल्हा, असं राज म्हणाले.
Ajit Pawar : निवेदिका पुण्याच्याच आहेत का हो? चंद्रकांत पाटलांना ‘वगळताच’ अजितदादांचा टोला, फडणवीस म्हणाले तुम्हीच त्यांना…
इथे अनेकांच्या जमिनी चालल्यात, व्यवहार करणारेही आपलेच, त्यामुळे कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती. शेतकरीही बरबाद होतोय, उद्योग धंद्यांमध्ये मराठी कामगार नाही तर बाहेरच्या राज्यातील लोक भरती होत आहेत. या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. मग त्याचा काय उपयोग? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
ठाण्यात तिसरीच्या अभ्यासक्रमात हिंदी; मनसे नेते शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले, थेट इशारा
Maharashtra Politics : बॅनरवर लहान फोटो, पुर्वेश सरनाईकांच्या ऑफिसबाहेर दोन गटात हाणामारी, सचिवाची युवासेनेतून हकालपट्टी
पंतप्रधान असो किंवा या देशाचे गृहमंत्री, दोघंही गुजराती आहेत. ते ठणकावून सांगतात की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे. राज्यातले अनेक प्रकल्प गुजरातला गेले. मी विचारलं गुजरातमध्ये आहे का हिंदी? नाही, मग महाराष्ट्रात का आणता? तुमची जमीन गेली की तुम्हाला स्थान नाही. तुम्ही गुजरातला गेलात तर तुम्हाला जमीन विकत घेता येत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

