• Sat. Mar 7th, 2026
    माणिकरावांचं मंत्रिपद वाचलं अन्….; अजित दादांनी एकाच दगडात दोन पक्षी कसे मारले? वाचा A टू Z

    Ajit Pawar NCP Politics : रमीचा डाव खेळल्याने वादात सापडल्याने माणिकराव कोकाटेंचे खातेपालट करण्यात आले. यानंतर दत्तात्रय भरणेंना कृषीमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला. यामध्ये अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जाते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    दीपक पडकर, बारामती : विधीमंडळाच्या सभागृहात रमीचा डाव खेळल्याने अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांची विकेट जाणार, असे निश्चित असतानाच अजित पवारांनी डाव उलटवला. आणि माणिकराव कोकाटे ही मंत्रिमंडळात राहिले, तर दुसरीकडे दत्तात्रय भरणे कृषिमंत्री झाले. अजित पवारांचे जवळचे विश्वासू असूनही दत्तात्रय भरणे यांच्या वाट्याला क्रीडासारखे खाते आले होते. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज होते. आता त्यांच्या कार्यकर्त्यांची ही नाराजी या निमित्ताने दूर झाली आहे.

    काल माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीमंत्री पद काढून घेऊन त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आले आणि दत्तात्रय भरणे व कोकाटे यांच्या खात्यांची अदलाबदल करण्यात आली. अर्थात कृषिमंत्री पद मिळाल्याने दत्तात्रय भरणे यांच्यासाठी ही लॉटरीच मानली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. अचानक दत्तात्रय भरणे हे राज्याच्या चौथ्या स्थानावर आल्याने त्यांचे कार्यकर्ते खुश झाले आहेत.

    काहीही न मिळता व काहीही न करता बारामतीकर भरपूर देतात. असे दत्तात्रय भरणे काही दिवसांपूर्वी बोलले होते. त्याची प्रचिती त्यांना यानिमित्ताने आली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय कार्यकर्तेच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्यांना अनेक पदे अशाच प्रकारे अचानकपणे मिळालेली आहेत. कोणतीही शक्यता नसताना त्यांच्या वाट्याला कृषी मंत्रीपद आल्याने ही चर्चा आणखीच वाढली आहे. कारण दत्तात्रय भरणे हे छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवडून गेले. तिथे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले, त्यानंतर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडले गेले. तिथेही ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले, जिल्हा परिषदेवर ते सदस्य म्हणून निवडून गेले. आणि त्याही ठिकाणी ते अध्यक्ष झाले.‌ व ते आता कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा