Malegaon Bomb Blast Case Pragya Singh Thakur : ज्यांनी आमच्यावर भगव्या दहशतवादाचा शिक्का मारला, त्यांना देवच योग्य ती शिक्षा देईल, अशा भावना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर व्यक्त केली.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर काय म्हणाल्या?
“माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मी 17 वर्षे अपमानित झाले. आम्ही खूप त्रास सहन केला. पहिल्या दिवसापासूनच आम्हाला माहिती होते की, आम्ही निर्दोष आहोत. स्वतःच्याच देशात मला दहशतवादी ठरवण्यात आलं. ज्यांनी मला हे दिवस आणले त्यांच्याविषयी बोलू शकत नाही. संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे, हा भगव्याचा आणि हिंदुत्वाचा विजय आहे. मला ऐकल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल न्यायाधीशांचे आभार” असं Pragya Singh Thakur म्हणाल्या.”अटकेनंतर दहशतवादी म्हणून शिक्का लागल्याने जिवंत असूनही एक प्रकारे मरणयातना सहन करत होते. पण आज अखेर न्याय मिळाला. भगवा आतंकवाद म्हणून ज्यांनी आमच्यावर शिक्का लावला त्यांना देवच योग्य ती शिक्षा देईल” अशा भावना माजी खासदार Pragya Singh Thakur च्या निकालानंतर कोर्टासमोर व्यक्त केल्या.
सात आरोपींची निर्दोष सुटका
Pragya Singh Thakur, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सर्वांनीच 17 वर्षांनी पुनर्जन्म झाल्याच्या भावना व्यक्त करताना समीर कुलकर्णी यांना कोर्टातच अश्रू अनावर झाले. पुढेही देशासाठी काम करत राहणार असल्याचं ते म्हणाले. मला स्वतःच्याच देशात दहशतवादी ठरवलं गेलं, समाजात कुटुंबाची अवहेलना झाली, असं मेजर रमेश उपाध्याय निकालानंतर म्हणाले.
दरम्यान, भाजप नेत्या उमा भारती यांनी “भोपाळच्या माजी खासदार Pragya Singh Thakur आज निर्दोष सिद्ध झाल्या आहेत. प्रज्ञाजींचे अभिनंदन आणि माननीय न्यायालयाचे अभिनंदन” अशी प्रतिक्रिया ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊण्टवरुन दिली आहे.

