Youth Dies Due To Electric Shock : वीज वीतरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून त्याची पत्नी गर्भवती आहे.
हायलाइट्स:
- धुळ्यात हृदयद्रवक घटना
- विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
- विज वितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
- सहा महिन्यांपूर्वीच तरुणाचे लग्न झाले होते
काय घडलं?
वार गावातील शाळेजवळ ही दुर्दैवी घटना घडली. लाईनमन दीपक चौधरी यांनी तक्रार आल्यानंतर दुरुस्ती करायला हवी होती. पण त्यांनी आकाश पाटीलला सोबत घेतले आणि त्याला पोलवर चढायला सांगितले. चौधरी खालीच थांबले. वीज पुरवठा बंद करण्यासाठी त्यांनी ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांना सांगितले. मात्र, वानखेडे यांनी निष्काळजीपणे दुसऱ्याच गावाचा वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे आकाशला शॉक लागला. आकाशला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Pune Crime : पुण्यात 23 वर्षीय आयटी इंजिनिअरने आयुष्य संपवलं, वेदनादायी अंत; शेवटच्या चिठ्ठीत म्हणाला माझ्या मृत्यूस…
गावकऱ्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत आकाशवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. “जोपर्यंत दोषींना अटक होवून कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही आकाशवर अंत्यसंस्कार करणार नाहीत”, असे गावकऱ्यांनी म्हटले. पोलिसांनी दोषींविरोधात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nagpur Crime : जुन्या वादाने घात केला, एका रात्रीत दोघांचा जीव घेतला; नागपुरात खळबळ
आकाशचा मावस भाऊ योगेश पाटील यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. या तक्रारीनुसार एमईसीबीचे वार कार्यालयातील लाईनमन दीपक नाना चौधरी, सिनीअर ऑपरेटर, रोहिदास के, वानखेडे, असि. इंजि. हेमंत दिलीप ठाकूर, उप कार्यकारी अधिकारी मनोज सुदाम भावसार या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी लाईनमन दीपक चौधरी आणि ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांना अटक केली आहे. इतरांवर कारवाई करण्यासाठी पुरावे मागितले आहेत. आकाशचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याची पत्नी गरोदर आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

