• Thu. Jun 18th, 2026

    ट्रम्प यांच्या कॉलमुळे नाही, तर पाकिस्तानच्या डीजीएमओंनी केली संघर्षविरामाची विनंती; लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांची माहीती

    ByMH LIVE NEWS

    Jul 28, 2025 #about-operation-sindoor, #China Pakistan, #donald trump, #donald trump latest news, #Donald Trump news, #donald trump news today, #Nagpur, #nagpur news, #nagpur news in marathi, #nagpur news marathi, #nagpur news today, #nagpur news update, #operation sindoor, #operation sindoor live updates, #operation sindoor politics, #Operation Sindoor Updates, #pahalgam, #pahalgam attack, #Pahalgam attack news, #pahalgam news, #pahalgam terro attack, #Pahalgam Terror Attack, #pahalgam terrorist attack, #pakistan pahalgam terror attack, #Pakistan's DGMO requests ceasefire, #usa donald trump, #ऑपरेशन सिंदूर, #ऑपरेशन सिंदूर मराठी, #ऑपरेशन सिंदूरबाबात मोठी माहिती, #ऑपरेशन सिंदूरवर राजकारण, #चीन पाकिस्तान, #डोनाल्ड ट्रम्प, #डोनाल्ड ट्रम्प न्यूज, #डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, #नागपूर, #नागपूर न्यूज, #नागपूर बातमी, #नागपूर बातम्य, #नागपूर बातम्या, #नागपूर बातम्या मराठी, #पहलगाम, #पहलगाम दहशतवादी हल्ला, #पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे परिणाम, #पहलगाम हल्ला, #पहलगाम हल्ला अपडेट, #पाकिस्तान पहलगाम दहशतवादी हल्ला, #पाकिस्तानच्या डीजीएमओंची संघर्षविरामाची विनंती
    ट्रम्प यांच्या कॉलमुळे नाही, तर पाकिस्तानच्या डीजीएमओंनी केली संघर्षविरामाची विनंती; लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांची माहीती

    Operation Sindoor : लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंडारे यांनी भारत किती सुरक्षित आहे यावर विचार व्यक्त केले. भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने संघर्षविरामाची विनंती केली होती. अमेरिकेसारख्या देशांना सतत युद्ध हवे असते, असेही ते म्हणाले. चीन-पाकिस्तान एकत्र आले तरी भारत सक्षम आहे.

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘पहलगाम येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर त्यांनी आपल्या नागरिकांवर हल्ला चढविला. त्यामुळे आपण त्यांच्या अकरा हवाईतळांना लक्ष्य केले. त्यातून झालेले नुकसान लक्षात घेत पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजीएमओंना संघर्षविरामाची विनंती केली. ट्रम्प यांच्या कॉलमुळे हा संघर्षविराम झालेला नाही.

    तसेच त्यांच्या सांगण्यावरून भारतीय लष्कराचे नियोजन ठरत नसते’, अशी माहिती संरक्षण विभागाचे माजी मुख्य सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंडारे यांनी रविवारी दिली. जनमंचतर्फे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलमधील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी खंडारे यांनी ‘जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात भारत किती सुरक्षित’ या विषयावर विचार मांडलेत.

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत होणार महत्वाची चर्चा, विरोधकांना उत्तर देण्यासाठी कोण-कोण सांभाळणार मोर्चा? जाणून घ्यात्यांना शरद पाटील यांनी विविध प्रश्न विचारून बोलत केले. ‘ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट पूर्ण झाले का’, यावर बोलताना खंडारे म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर हे दहशतावाद्यांचा बिमोड करण्यासाठी होते. आपण कधीही पाकिस्तानच्या नागरिकांवर हल्ला केला नाही. या मोहिमेंतर्गत आपण पाकचे बरेच नुकसान केले. त्यामुळेच त्यांच्याकडून संघर्षविरामाची विनंती झाली.

    Donald Trump: भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्धाची शक्यता होती, पण…; ट्रम्प यांच्या दाव्याने पुन्हा खळबळतसेच मिलिटरीच्या लोकांना ट्रम्प यांचे कॉल येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कॉलनंतर आम्ही थांबायचे काहीच कारण नाही. अमेरिकेसारख्या शस्त्रनिर्मिती करणाऱ्या देशांना सतत युद्ध हवे असते. ते अशी युद्धे घडवित असतात. आजघडीला भारताची होत असलेली प्रगती कुणालाही नकोशी असल्यामुळे अनेक शेजारी आपल्यासोबत नाहीत, ही परिस्थिती आपण समजून घ्यायला हवी.

    आज चीन-पाकिस्तान एकत्र आलेले असून दोघांचाही सामना भारत करत आहे आणि या दोघांनाही धडा शिकविण्यास आपण सक्षम आहोत. यावेळी त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश यांच्यावर कधीह विश्वास ठेवू नये. ते कधीही काहीही करू शकतात, त्यासाठी आपण सज्ज आहोत. सैन्याचे कधीही सरकारीकरण होणार नाही, याबद्दल नागरिकांनी आश्वस्त राहावे.’

    Nashik News: सिंहस्थ तयारीसाठी रेल्वेचा ₹1,011 कोटींचा ‘जम्बो प्लॅन’, पाच स्थानकांवर सुविधा सुधारणारनागरी सुरक्षेबाबत आपण तयार नाही

    आज एकीकडे सीमेवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने सैनिक लढताहेत. पण, नागरी सुरक्षेचा विचार करता आपण आज पूर्णपणे तयार नसल्याचे चित्र आहे. ऑपरेशन सिंदूर झाले तेव्हा नागपूरसह अनेक शहरांमध्ये साध्या सायरनचीदेखील उपलब्धता नव्हती. सीमावर्ती भागातील राज्यांमध्ये नागरी सुरक्षा कडक होत असताना ती संपूर्ण देशभरात का होऊ नये, असा सवाल विनोद खंडारे यांनी केला.

    तत्पूर्वी, अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे म्हणाले, ‘आज युद्धाचे स्वरूप बदलले आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने दोन ठिकाणी अणुबॉम्ब टाकले आणि ते महायुद्ध थांबले. आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. अणुशक्तीसंपन्न देश संघर्ष करताहेत, ही स्थिती भयावह आहे.’

    Maharashtra Honey Trap Case : Prafulla Lodha च्या हनी ट्रॅपमध्ये राजकीय नेते ? लोढाचा सूत्रधार कोण ?

    प्रास्ताविक जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप, सूत्रसंचालन किशोर गलांडे यांनी केले. कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, कृषी अभ्यासक डॉ. अमिताभ पावडे, विदर्भवादी नेते नितीन रोंघे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed