Mumbra News: मुंब्रा बायपासवरील आदिवासी पाडा येथे पाच १८ वर्षीय मुलं फिरायला गेली असताना परतीचा मार्ग चुकल्याने ती डोंगरात अडकली होती. पावसामुळे त्यांना तब्बल ९ तास एका ठिकाणी बसून राहावं लागलं. पोलिसांना माहिती मिळताच बचावकार्य सुरू करत मुलांची सुखरूप सुटका केली.
मुंब्रा बायपासवरील आदिवासी पाडा येथे शनिवारी दुपारी तीन वाजता पाच १८ वर्षीय मुले फिरायला गेली होती. काही वेळाने अंधार झाला. परतीचा मार्ग न मिळाल्याने ही मुले येथे अडकली होती. त्यात पाऊस सुरु झाल्याने वाट सापडत नसल्याने मुलांनी झाडाच्या खालीच बसून राहण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करण्यात आले. नऊ तासांनंतर डोंगरावर अडकलेला मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. सय्यद अयुब, शोएब खान, अमूर खान, अरहान खान, मुददशीर गुफारे अशी त्यांची नावे असून ते मुंब्रा येथील अमृतनगर भागात राहणारे आहेत
शहापूर हादरलं! आईला लेकी झाल्या नकोश्या, जेवायला दिलं अन्…, तीन सख्ख्या बहिणींसोबत काय घडलं?
तहान, भुकेने व्याकुळ आणि योगायोग
तब्बल नऊ तास तहानेने आणि भुकेने ही मुले व्याकुळ झाली होती. डोंगरात पावसाचा जोर वाढल्याने त्यांचे कपडे भिजले. चिंब ओल्या अंगाने थंडीने कुडकुडत ही मुले बचाव पथकाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. गेल्या वर्षीही जुलै महिन्यात अशाच पद्धतीने पाच मुले या डोंगरावर वाट चुकली होती. त्यांचीही सात तासांनी बचाव पथकांनी सुटका केली होती. दरवर्षी पावसात अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी अनोळखी ठिकाणी फिरायला जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन बचाव पथकाच्या जवानांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड समिती अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले, नेमकं काय घडलं?
… आणि वेगाने चक्रे फिरली
सायंकाळनंतर मुले घरी न आल्याने पालक चिंताग्रस्त झाले. त्यांनी थेट मुंब्रा अग्निशमन केंद्र गाठले. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांना कळताच त्यांनी टीमला घटनास्थळी पाठवले. यावेळी मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या टीमने मदतकार्य सुरु केले. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही.
