Ramdas Kadam : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे असलेल्या मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नूतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी रामदासभाई कदम यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने भाषण केलं. यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली.
याच विषयाला पुढे नेत त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. मागील वेळी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आमदार शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार संजय कदम यांच्या हातात एबी फॉर्म देतो. सगळं तालुकाध्यक्षांची हकालपट्टी करतो आणि आता योगेश कदम मंत्री झाल्यावर सभागृहात मंत्री म्हणून गेल्यापासून पहिल्या दिवसापासून खोटे नाटे आरोप करून त्यांचं एकच आहे की, राजीनामा दे राजीनामा दे अरे काय कोणाच्या अंगावर येता? कसला राजीनामा मागता? अरे नियमांमध्ये तरी बसते का? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. जगामधला असा एकमेव पक्षप्रमुख असेल, आपल्या तरुण आमदाराला आपणच संपवतोय, असा पहिला नेता कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आणि त्याचे हे पिल्लू याच्या खांद्यावर ते बंदूक ठेवून चाप ओढतय, अशा शब्दात बोचरी टीका रामदास कदम यांनी अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
‘होय होय कोकण आजही शिवसेनेचाच बालेकिल्ला’
“होय होय कोकण हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. तो भगव्या झेंड्याचा आहे आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि भविष्य घेणाऱ्या निवडणुकांमध्येही सगळं कोकण शिवसेनेचेच राहणार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा फडकणार”, अशी ग्वाही रामदास कदम यांनी दिली.
महामार्गावरून सरकारला घरचा आहेर
मुंबई-गोवा महामार्गाचे बघा पंधरा वर्षे रखडला आहे. मुंबई गेल्यानंतर तेवढे बघा आणि या महामार्गावरून फक्त शिंदे साहेबांसारखाच नेता मंत्री येऊ शकतो असं शिंदे यांचे कौतुक करत रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावरून रामदास कदम यांनी थेट सरकारला घरचा आहेर दिला आहे. इतक नाही तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही राजापूर रत्नागिरी पर्यंत उदय सामंत, योगेश कदम या मंत्र्यांना घेऊन जा आणि बघा काय परिस्थिती आहे. गणपती आले की ठिगळ लावतात. पुन्हा पाऊस आला की पुन्हा जैसे परिस्थिती अशी अवस्था या महामार्गाची आहे, असं सांगत महामार्गाच्या विषयावरून रामदास कदम यांनी थेट सुनावलं आहे.

