Beed Crime News : शिरूर तालुक्यातील वडाळी गावात एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी मुलीच्या तोंडावर स्प्रे मारून तिला शेतात नेऊन बांधलं. या घटनेमुळे गावात एकच खळबळ भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी दुपारी वडाळीतील एका १७ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची माहिती समोर आली. मुलगी घराच्या मागे उभी होती. तेव्हा दोन अज्ञात लोक आले. त्यांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला. तोंडावर स्प्रे मारल्यामुळे मुलगी बेशुद्ध झाली. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर स्प्रे मारलेल्या दोघांनी मुलीला ओढत शेतात नेलं. शेतात नेत तिचे हातपाय दोरीने बांधले.
रात्री अचानक उलट्यांचा आवाज, एकाच कुटुंबातील चौघांनी उचललं टोकाचं पाऊल; गावात खळबळ, काय घडलं?
मुलगी बराच वेळ दिसली नाही. त्यानंतर मुलीची आई तिला आजूबाजूच्या परिसारत शोधू लागली. मुलीची आई तिला शोधत असताना तिला मुलगी दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळली. मुलीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तिने मुलीला सोडवलं. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.वडाळी गावात १७ वर्षीय मुलीसोबत घडलेली ही पहिलीच घटना नाही. अशा प्रकारची घटना वडाळी गावात तिसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी २७ जून २०२४ आणि १७ ऑगस्ट २०२४ रोजीही असेच प्रकार घडले होते. त्यावेळी तक्रार करूनही पोलिसांनी तपास केला नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
Solapur News : मला अजून पोलीस का घेऊन जात नाहीत? रस्त्यात शेतकरी पुटपुटत होता, नंतर उघड झाली भयंकर घटना
मुलीच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं, यापूर्वी तक्रार दिली, परंतु पोलिसांनी सखोल तपास केला नाही. त्यामुळेच शनिवारी पुन्हा ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना शोधून काढण्याची मागणी होत आहे. किमान आता तरी पोलिसांनी सखोल तपास करुन असा प्रकार करणाऱ्या आरोपीला शोधून काढावं, असं ते म्हणाले.
मराठी तरुणीसोबत गंभीर प्रकार; पोलिसांनी आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केलं
एकाच गावात वारंवार अशा घटना घडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

